शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पिण्याच्या पाण्यावाचून रूग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:40 IST

जिल्हा रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने रूग्णालयाला होणारा पाणीपुरवठाच बंद झाला. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रूग्णांचे बेहाल होत आहेत. तर नातेवाईक पिण्याचे पाणी आणण्यासाठी परिसरात भटकत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने रूग्णालयाला होणारा पाणीपुरवठाच बंद झाला. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रूग्णांचे बेहाल होत आहेत. तर नातेवाईक पिण्याचे पाणी आणण्यासाठी परिसरात भटकत आहेत.जिल्हा रूग्णालय दिवसेंदिवस समस्येचे माहेरघर बनत चालले आहे. रूग्णालयातील असुविधांचा पाढाही मोठा आहे. विशेष म्हणजे येथील पाणीप्रश्न मागील चार दिवसांपासून गंभीर बनला आहे. रूग्णालयास पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनच नादुरूस्त झाली आहे. तर पालिकेने याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना दुरूस्ती करून घेण्याचे पत्र दिले. परंतु संबधित कर्मचाºयास पाईपलाईन दुरूस्तीच्या केव्हाही सूचना दिल्या जात आहेत. दुरूस्तीसाठी लागणाºया खर्चाबाबत कर्मचाºयास पैसे दिले जात नाहीत. परंतु या ताळमेळात मात्र शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाºया रूग्णांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. रूग्णांचे नातेवाईक पाण्याच्या शोधात रुग्णालय परिसरात भटकंती करीत आहेत. परिसरातील हॉटेलचालकही काही तरी खरेदी केल्याशिवाय पाणी देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाईलाजास्तव पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.याबाबत शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले पाणी समस्या सोडविण्याचे प्रभारी सीएस डॉ. मंगेश टेहरे यांना सांगितले आहे. तर पाईपलाईन दुरूस्तीचे काम दोन दिवसांत पॅर्ण करुन घेणार असल्याचे डॉ. टेहरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य रुग्णालयात टोलवा-टोवलीचा खेळ सुरू आहे. त्यात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी भेट देऊन कडक शब्दांत सुनावले तरीही सवयींचे गुलाम झालेल्या रुग्णालय प्रशासनाला जाग येत नसल्याचे चित्र आहे. केवळ दिवस ढकलण्यासाठीच अनेकांनी या रुग्णालयाची सेवा पत्करली असून सर्वच लोकप्रतिनिधींची याला मूक नव्हे, तर उघड संमती असल्याने जनतेच्या आरोग्याचा खेळखंडोबा झाला तरीही कुणाला सोयरसुतक नाही.