शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पिण्याच्या पाण्यावाचून रूग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:40 IST

जिल्हा रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने रूग्णालयाला होणारा पाणीपुरवठाच बंद झाला. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रूग्णांचे बेहाल होत आहेत. तर नातेवाईक पिण्याचे पाणी आणण्यासाठी परिसरात भटकत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने रूग्णालयाला होणारा पाणीपुरवठाच बंद झाला. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रूग्णांचे बेहाल होत आहेत. तर नातेवाईक पिण्याचे पाणी आणण्यासाठी परिसरात भटकत आहेत.जिल्हा रूग्णालय दिवसेंदिवस समस्येचे माहेरघर बनत चालले आहे. रूग्णालयातील असुविधांचा पाढाही मोठा आहे. विशेष म्हणजे येथील पाणीप्रश्न मागील चार दिवसांपासून गंभीर बनला आहे. रूग्णालयास पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनच नादुरूस्त झाली आहे. तर पालिकेने याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना दुरूस्ती करून घेण्याचे पत्र दिले. परंतु संबधित कर्मचाºयास पाईपलाईन दुरूस्तीच्या केव्हाही सूचना दिल्या जात आहेत. दुरूस्तीसाठी लागणाºया खर्चाबाबत कर्मचाºयास पैसे दिले जात नाहीत. परंतु या ताळमेळात मात्र शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाºया रूग्णांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. रूग्णांचे नातेवाईक पाण्याच्या शोधात रुग्णालय परिसरात भटकंती करीत आहेत. परिसरातील हॉटेलचालकही काही तरी खरेदी केल्याशिवाय पाणी देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाईलाजास्तव पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.याबाबत शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले पाणी समस्या सोडविण्याचे प्रभारी सीएस डॉ. मंगेश टेहरे यांना सांगितले आहे. तर पाईपलाईन दुरूस्तीचे काम दोन दिवसांत पॅर्ण करुन घेणार असल्याचे डॉ. टेहरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य रुग्णालयात टोलवा-टोवलीचा खेळ सुरू आहे. त्यात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी भेट देऊन कडक शब्दांत सुनावले तरीही सवयींचे गुलाम झालेल्या रुग्णालय प्रशासनाला जाग येत नसल्याचे चित्र आहे. केवळ दिवस ढकलण्यासाठीच अनेकांनी या रुग्णालयाची सेवा पत्करली असून सर्वच लोकप्रतिनिधींची याला मूक नव्हे, तर उघड संमती असल्याने जनतेच्या आरोग्याचा खेळखंडोबा झाला तरीही कुणाला सोयरसुतक नाही.