शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पिण्याच्या पाण्यावाचून रूग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:40 IST

जिल्हा रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने रूग्णालयाला होणारा पाणीपुरवठाच बंद झाला. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रूग्णांचे बेहाल होत आहेत. तर नातेवाईक पिण्याचे पाणी आणण्यासाठी परिसरात भटकत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने रूग्णालयाला होणारा पाणीपुरवठाच बंद झाला. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रूग्णांचे बेहाल होत आहेत. तर नातेवाईक पिण्याचे पाणी आणण्यासाठी परिसरात भटकत आहेत.जिल्हा रूग्णालय दिवसेंदिवस समस्येचे माहेरघर बनत चालले आहे. रूग्णालयातील असुविधांचा पाढाही मोठा आहे. विशेष म्हणजे येथील पाणीप्रश्न मागील चार दिवसांपासून गंभीर बनला आहे. रूग्णालयास पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनच नादुरूस्त झाली आहे. तर पालिकेने याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना दुरूस्ती करून घेण्याचे पत्र दिले. परंतु संबधित कर्मचाºयास पाईपलाईन दुरूस्तीच्या केव्हाही सूचना दिल्या जात आहेत. दुरूस्तीसाठी लागणाºया खर्चाबाबत कर्मचाºयास पैसे दिले जात नाहीत. परंतु या ताळमेळात मात्र शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाºया रूग्णांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. रूग्णांचे नातेवाईक पाण्याच्या शोधात रुग्णालय परिसरात भटकंती करीत आहेत. परिसरातील हॉटेलचालकही काही तरी खरेदी केल्याशिवाय पाणी देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाईलाजास्तव पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.याबाबत शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले पाणी समस्या सोडविण्याचे प्रभारी सीएस डॉ. मंगेश टेहरे यांना सांगितले आहे. तर पाईपलाईन दुरूस्तीचे काम दोन दिवसांत पॅर्ण करुन घेणार असल्याचे डॉ. टेहरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य रुग्णालयात टोलवा-टोवलीचा खेळ सुरू आहे. त्यात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी भेट देऊन कडक शब्दांत सुनावले तरीही सवयींचे गुलाम झालेल्या रुग्णालय प्रशासनाला जाग येत नसल्याचे चित्र आहे. केवळ दिवस ढकलण्यासाठीच अनेकांनी या रुग्णालयाची सेवा पत्करली असून सर्वच लोकप्रतिनिधींची याला मूक नव्हे, तर उघड संमती असल्याने जनतेच्या आरोग्याचा खेळखंडोबा झाला तरीही कुणाला सोयरसुतक नाही.