शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

कागदपत्रांअभावी अडले तुरीचे चुकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:37 IST

जिल्ह्यात पाचही ठिकाणी नाफेडने खरेदी केंद्र सुरु केले असून, तूर विक्री करण्यास पाहिजे तसा शेतकºयांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे आता खरेदी केलेल्या तुरीचे जवळपास सव्वासहा कोटींचे चुकारेही कागदपत्राअभावी अडल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पाचही ठिकाणी नाफेडने खरेदी केंद्र सुरु केले असून, तूर विक्री करण्यास पाहिजे तसा शेतकºयांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे आता खरेदी केलेल्या तुरीचे जवळपास सव्वासहा कोटींचे चुकारेही कागदपत्राअभावी अडल्याचे समोर आले आहे.नाफेड केंद्रावर तुरीची खरेदी कमी अन् गोंधळच जास्त होत असल्याने नोंदणी केलेले शेतकरीही शक्यतोर या ठिकाणी तूर खरेदीस घेऊन येत नाहीत. येथे तूर घेऊन आल्यानंतर होणाºया गोंधळाला कंटाळूनच अनेकांनी तर खाजगी बाजारात मिळेल त्या दरात तूर विकली. आजघडीला तूर खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकºयांची नोंदणी झालेली असली तरीही शेतकरी मात्र माल आणताना दिसत नाहीत. सद्यस्थितीत हिंगोली येथील खरेदी केंद्रावर १२३ शेतकºयांची १ हजार ४५६ क्विंटल, सेनगावच्या केंद्रावर २८८ शेतकºयांची ३१९८.५० क्विंटल आणि कळमनुरी येथील केंद्रावर ३६९ शेतकºयांची २९४० क्विंटल, वसमत येथील केंद्रावर २१७ शेतकºयांची १२७३.५० क्विं, आणि जवळा बाजार येथील खरेदी केंद्रावर ३३० शेतकºयांची २ हजार ९२१. ५० क्विंटल अशी एकूण १३२७ शेतकºयांची ११ हजार ७८९. ५० क्विंटल तुरीची खरेदी केल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडून मिळाली आहे. मात्र तूर खरेदी झाल्यानंतरही अनेक कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळे शेतकºयांना तुरीचे चुकारे देण्यासाठी अडचणी येत आहेत. तूर खरेदी केलेल्या शेतकºयांचे कागदपत्र तपासणी सुरु असून, ते पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यावर चुकारे टाकण्यात येणार असल्याचे मार्केटींग अधिकारी शेवाळे यांनी सांगितले.नाफेड केंद्रावर तूर विक्री केलेल्या शेतकºयांना कधीच चुकारे वेळेवर मिळत नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे. येथे नेहमीच चुकाºयाची बोंबाबोंब होत असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. येथील खेळीमेळी वातावरणामुळेच नाईलाजास्तव खाजगी बाजारात तूर विक्री करण्याची वेळ येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच येथे वारंवार होत असलेल्या चाळणीमुळे आणि जाचक अटीमुळे तूर विकणेही न परवडणारे झाले आहे.