शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांअभावी अडले तुरीचे चुकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:37 IST

जिल्ह्यात पाचही ठिकाणी नाफेडने खरेदी केंद्र सुरु केले असून, तूर विक्री करण्यास पाहिजे तसा शेतकºयांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे आता खरेदी केलेल्या तुरीचे जवळपास सव्वासहा कोटींचे चुकारेही कागदपत्राअभावी अडल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पाचही ठिकाणी नाफेडने खरेदी केंद्र सुरु केले असून, तूर विक्री करण्यास पाहिजे तसा शेतकºयांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे आता खरेदी केलेल्या तुरीचे जवळपास सव्वासहा कोटींचे चुकारेही कागदपत्राअभावी अडल्याचे समोर आले आहे.नाफेड केंद्रावर तुरीची खरेदी कमी अन् गोंधळच जास्त होत असल्याने नोंदणी केलेले शेतकरीही शक्यतोर या ठिकाणी तूर खरेदीस घेऊन येत नाहीत. येथे तूर घेऊन आल्यानंतर होणाºया गोंधळाला कंटाळूनच अनेकांनी तर खाजगी बाजारात मिळेल त्या दरात तूर विकली. आजघडीला तूर खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकºयांची नोंदणी झालेली असली तरीही शेतकरी मात्र माल आणताना दिसत नाहीत. सद्यस्थितीत हिंगोली येथील खरेदी केंद्रावर १२३ शेतकºयांची १ हजार ४५६ क्विंटल, सेनगावच्या केंद्रावर २८८ शेतकºयांची ३१९८.५० क्विंटल आणि कळमनुरी येथील केंद्रावर ३६९ शेतकºयांची २९४० क्विंटल, वसमत येथील केंद्रावर २१७ शेतकºयांची १२७३.५० क्विं, आणि जवळा बाजार येथील खरेदी केंद्रावर ३३० शेतकºयांची २ हजार ९२१. ५० क्विंटल अशी एकूण १३२७ शेतकºयांची ११ हजार ७८९. ५० क्विंटल तुरीची खरेदी केल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडून मिळाली आहे. मात्र तूर खरेदी झाल्यानंतरही अनेक कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळे शेतकºयांना तुरीचे चुकारे देण्यासाठी अडचणी येत आहेत. तूर खरेदी केलेल्या शेतकºयांचे कागदपत्र तपासणी सुरु असून, ते पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यावर चुकारे टाकण्यात येणार असल्याचे मार्केटींग अधिकारी शेवाळे यांनी सांगितले.नाफेड केंद्रावर तूर विक्री केलेल्या शेतकºयांना कधीच चुकारे वेळेवर मिळत नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे. येथे नेहमीच चुकाºयाची बोंबाबोंब होत असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. येथील खेळीमेळी वातावरणामुळेच नाईलाजास्तव खाजगी बाजारात तूर विक्री करण्याची वेळ येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच येथे वारंवार होत असलेल्या चाळणीमुळे आणि जाचक अटीमुळे तूर विकणेही न परवडणारे झाले आहे.