शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कागदपत्रांअभावी अडले तुरीचे चुकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:37 IST

जिल्ह्यात पाचही ठिकाणी नाफेडने खरेदी केंद्र सुरु केले असून, तूर विक्री करण्यास पाहिजे तसा शेतकºयांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे आता खरेदी केलेल्या तुरीचे जवळपास सव्वासहा कोटींचे चुकारेही कागदपत्राअभावी अडल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पाचही ठिकाणी नाफेडने खरेदी केंद्र सुरु केले असून, तूर विक्री करण्यास पाहिजे तसा शेतकºयांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे आता खरेदी केलेल्या तुरीचे जवळपास सव्वासहा कोटींचे चुकारेही कागदपत्राअभावी अडल्याचे समोर आले आहे.नाफेड केंद्रावर तुरीची खरेदी कमी अन् गोंधळच जास्त होत असल्याने नोंदणी केलेले शेतकरीही शक्यतोर या ठिकाणी तूर खरेदीस घेऊन येत नाहीत. येथे तूर घेऊन आल्यानंतर होणाºया गोंधळाला कंटाळूनच अनेकांनी तर खाजगी बाजारात मिळेल त्या दरात तूर विकली. आजघडीला तूर खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकºयांची नोंदणी झालेली असली तरीही शेतकरी मात्र माल आणताना दिसत नाहीत. सद्यस्थितीत हिंगोली येथील खरेदी केंद्रावर १२३ शेतकºयांची १ हजार ४५६ क्विंटल, सेनगावच्या केंद्रावर २८८ शेतकºयांची ३१९८.५० क्विंटल आणि कळमनुरी येथील केंद्रावर ३६९ शेतकºयांची २९४० क्विंटल, वसमत येथील केंद्रावर २१७ शेतकºयांची १२७३.५० क्विं, आणि जवळा बाजार येथील खरेदी केंद्रावर ३३० शेतकºयांची २ हजार ९२१. ५० क्विंटल अशी एकूण १३२७ शेतकºयांची ११ हजार ७८९. ५० क्विंटल तुरीची खरेदी केल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडून मिळाली आहे. मात्र तूर खरेदी झाल्यानंतरही अनेक कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळे शेतकºयांना तुरीचे चुकारे देण्यासाठी अडचणी येत आहेत. तूर खरेदी केलेल्या शेतकºयांचे कागदपत्र तपासणी सुरु असून, ते पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यावर चुकारे टाकण्यात येणार असल्याचे मार्केटींग अधिकारी शेवाळे यांनी सांगितले.नाफेड केंद्रावर तूर विक्री केलेल्या शेतकºयांना कधीच चुकारे वेळेवर मिळत नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे. येथे नेहमीच चुकाºयाची बोंबाबोंब होत असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. येथील खेळीमेळी वातावरणामुळेच नाईलाजास्तव खाजगी बाजारात तूर विक्री करण्याची वेळ येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच येथे वारंवार होत असलेल्या चाळणीमुळे आणि जाचक अटीमुळे तूर विकणेही न परवडणारे झाले आहे.