शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन जणांची कोरोनावर मात; तरी महिनाभरापासून रुग्णालयात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

शहरातील जिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. पण दुसरीकडे औंढा रोडवरील कोरोना सेंटरमध्ये ९ रुग्ण सद्य:स्थितीत असून त्यातील ...

शहरातील जिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. पण दुसरीकडे औंढा रोडवरील कोरोना सेंटरमध्ये ९ रुग्ण सद्य:स्थितीत असून त्यातील दोन रुग्णांनी कोरोना महामारीवर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु, श्वसनाच्या आजारामुळे त्यांना इतरत्र हलताही येत नाही. परिणामी गत महिनाभरापासून ते दोन रुग्ण औंढा रोडवरील रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्या दोन रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचेही डाॅक्टरांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात २१० सध्या बेड आहेत तर औंढा रोडवरील रुग्णालयात सध्या ९० बेड आहेत. औंढा रोडवर रुग्णांची काळजी घेण्यासाठी १० वैद्यकीय अधिकारी असून त्यांच्या मदतीला २० परिचारिका कार्यरत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची सकाळ, संध्याकाळी पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचेही या रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितले.

औंढा रोडवरील रुग्णालयात सद्य:स्थितीत नऊ रुग्ण दाखल आहेत. यापैकी दोघांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु, महिनाभरापासून त्यांना श्वसनाचा आजार आहे. सध्या त्यांच्यावर उपचारही सुरु आहेत. कोरोनापासून दूर राहायचे असेल तर मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक आंतर या त्रिसूत्रीचा नागरिकांनी उपयोग करुन घ्यावा. म्हणजे कोरोनाबरोबर इतर कोणताच आजार आपल्याजवळ येणार नाही.

- डाॅ. संजय नाकाडे, वैद्यकीय अधिकारी

श्वसनाच्या आजाराचे दोन रुग्ण

औंढा रोडवरील रुग्णालयात एकूण नऊ रुग्ण सद्य:स्थितीत दाखल आहेत. यापैकी दोन रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु, त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर दवाखान्यात राहण्याची वेळ येवून ठेपली आहे. सध्या त्या दोघांची प्रकृती चांगली आहे.

कोरोनातून बरा, पण श्वसनाचा त्रास सुरु

औंढा रोडवरील ‘त्या’ दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. परंतु, श्वसनाचा आजार सुरु झाल्यामुळे त्यांना कोणतीच हालचाल करता येत नाही.

सद्य:स्थीतीत ‘त्या’ रुग्णांची चांगल्या पद्धतीने देखरेखही केली जात आहे. तज्ज्ञ डाॅक्टर मंडळी त्या रुग्णांना वेळेवर औषधी देत आहेत.

बरे झाल्यानंतरही घ्या काळजी....

कोरोना महामारीतून बरे झाल्यानंतर इतरत्र न फिरता एकाच जागी विश्रांती घेणे गरजेचे आहे. सकाळच्यावेळी प्राणायाम करावा तसेच सात्वीक आहारावर जास्त भर द्यावा. एखाद्या आजाराचा जास्त त्रास होत असेल तर फॅमिली डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डाॅ. गायत्री मुलंगे यांनी सांगितले.