शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
3
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
4
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
5
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
6
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
7
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
8
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
9
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
10
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
11
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
12
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
13
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
14
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
15
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
16
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
17
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
18
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
19
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
20
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
Daily Top 2Weekly Top 5

कृषी आयुक्तांनी दिले फळपीक विमा मंजुरीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:17 IST

हिंगोली जिल्ह्यात २१ ते २५ एप्रिलदरम्यान सलग पाच दिवस ४२ अंशांपेक्षा जास्त तापमान होते. त्याचा फटका केळी पिकास बसला. ...

हिंगोली जिल्ह्यात २१ ते २५ एप्रिलदरम्यान सलग पाच दिवस ४२ अंशांपेक्षा जास्त तापमान होते. त्याचा फटका केळी पिकास बसला. त्यामुळे विमा कंपनीने काही भागांसाठी विमाही मंजूर केला. मात्र, डोंगरकडा मंडळात दोन दिवस तापमानात ०.१४ अंशांचा फरक आल्याने विमा नाकारला होता. तर शेजारच्या गिरगांव मंडळात मात्र याच काळात सलग पाच दिवस तापमानाची नोंद ४५ अंश सेल्सिअस झाली होती. त्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रातच तांत्रिक अडचण असल्याचा मुद्दा उपस्थित करून याची चौकशी करून संबंधितांना विमा देण्याची मागणी खासदार राजीव सातव यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली होती. त्यानंतर पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यांनी कृषी आयुक्तांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावरून परभणी कृषी विद्यापीठामार्फत स्वयंचलित हवामान केंद्राची चौकशी झाली. त्यात वडगाव येथील हवामान केंद्रानजीक बांधकाम व सभोवतालच्या झाडांमुळे तापमानाच्या नोंदीत फरक पडू शकतो, असा निष्कर्ष त्यांनी दिलेल्या अहवालात मांडला आहे. त्यामुळे अल्पशा फरकामुळे या शेतकऱ्यांचा विमा नाकारला जावू नये. तो मंजूर करण्यात यावा, असे पत्र कृषी आयुक्तांनी कृषी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांना दिले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न चर्चेत आहे. त्यामुळे आता तो निकाली निघण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.