शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

ऑनलाइन शिक्षण अन् मोबाइलने लावला मुलांना चष्मा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:21 IST

हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मुले अभ्यासात मागे राहू नये म्हणून याशिवाय पर्याय नाही. मात्र ...

हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मुले अभ्यासात मागे राहू नये म्हणून याशिवाय पर्याय नाही. मात्र हे करताना मुलांच्या आरोग्याचा विचार करून वेळेचे बंधन पाळले जात नाही. दर तीन मिनिटांनी विश्रांती आवश्यक असताना तसे होत नाही. सलग तासिकांमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण पडून डोकेदुखीचा त्रास होत आहे. अनेकांना या नादात चष्मा लागला आहे. पालकांना या मुलांना दवाखान्यात घेऊन जाण्याची वेळ येत आहे.

लहान मुलांमध्ये डोकेदुखी वाढली

मोबाइल स्क्रीन तुलनेने खूप लहान असते. त्यावर लिहिलेले वाचताना मुलांच्या डोळ्यांवर ताण पडतो. अभ्यासक्रमातही लहान मुलांना मोठ्या अक्षरात अभ्यासक्रम दिला जातो. मोबाइलवर हे सूत्र पाळता येत नाही. शिवाय एकाग्रता ठेवावी लागते. याचा परिणाम म्हणून डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे मध्येच डोळ्यांची उघडझाप करणे गरजेचे आहे.

लहान मुलांना हे धोके

तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाइल पाहिल्यास डोळ्यांवर ताण पडतो.

लहान आकाराच्या अक्षरांमुळे एकाग्रता करताना डोकेदुखी वाढते.

रेडिएशनचाही धोका जास्त संभवतो.

मोबाइलच्या अतिवापराने मुलांना चष्मा लागण्याची भीती असून इतरही त्रास होऊ शकतो.

मुलांना झेपेल एवढाच मोबाइल द्या

कोरोनामुळे शाळा ऑनलाइन झाल्या. त्याचा अभ्यासक्रम व इतर अवांतर बाबींसाठीही मुलांना मोबाइल दिला जातो. यामुळे त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे. अभ्यासाच्या वेळी ब्ल्यू फिल्टर लाईट वापरावा, अंगापासून १५ इंच दूर मोबाइल धरावा, दर अर्ध्या तासांनी विश्रांती घ्यावी. डोळ्यांची दर पाच मिनिटांनी उघडझाप करावी. तसेच मुलांना झेपेल एवढाच मोबाइल द्यावा.

डॉ.सोनाली गोपाल कदम, नेत्रचिकित्सक

पालकही चिंतेत

गेल्या वर्षी मुलांना ऑनलाइनच शिक्षण घ्यावे लागले. यंदाही तीच परिस्थिती आहे. लहान मुलांना मोबाइलवरचे हे शिक्षण घेताना डोळ्यांना त्रास होत आहे. मात्र त्यांना शिक्षणापासून वंचितही ठेवता येत नाही. शाळांनी मात्र मुलांना मोबाइलचे दुष्परिणाम सांगून ते कसा धरायचा, किती वेळ सतत बघायचे आदीचे मार्गदर्शन केले पाहिजे. पालकांपेक्षा शिक्षकांचे मुले ऐकतात.

-अभिजित निंगूरकर, पालक

यंदा पुन्हा ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. एकतर यावर मुलांचा कायम गोंधळ असतो. मात्र नाईलाजाने हे शिक्षण द्यावे लागत आहे. त्यातच सतत मोबाइलवर राहिल्याने मुलांना डोळ्यांचा त्रास होत आहे. डोकेदुखीची समस्या वाढत आहे. आरोग्यावरही परिणाम होत असेल. यावर काही उपाय नसला तरीही दोन तासिकांमध्ये योग्य अंतर तरी ठेवले पाहिजे.

- गणेश बांगर, पालक