शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

आता लोकप्रतिनिधी, गाव कर्मचाऱ्यांवर लसीकरणाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:32 IST

१६ जानेवारी २०२१ पासून राज्यात लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात ९.४९ लाख जणांना दोन्ही डोस द्यायचे आहेत. आतापर्यंत ३.५९ ...

१६ जानेवारी २०२१ पासून राज्यात लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात ९.४९ लाख जणांना दोन्ही डोस द्यायचे आहेत. आतापर्यंत ३.५९ लाख जणांना पहिला तर १.०९ लाख जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. हे काम फारसे समाधानकारक नाही. अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीच लसीचे दोन्ही डोस घेतले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विभागप्रमुखांनी यात लक्ष घालून अधिनस्त कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावे, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यात संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे कारवाईचा इशाराही देता येणार आहे. जर लसीकरण झाले नाही, तर विभागप्रमुखावर याची जबाबदारी राहणार आहे.

२३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना उद्दिष्टपूर्तीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या लसीचे ५० हजार डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या कामात कुणी हयगय केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाईचा इशाराही दिला आहे. यासाठी जास्तीत जास्त जागृती करून लसीकरणाचा टक्का वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकूण ३६ लसीकरण केंद्रांच्या ११५ सत्रांमधून २३ हजार जणांचे लसीकरण एकाच दिवशी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. २३ सप्टेंबरला यात किती जण लसीकरण करतील, यावर मोहिमेचे यश अवलंबून आहे. सर्व संबंधित यंत्रणांनाही याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे.

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार म्हणाले की, जिल्ह्यात सर्वत्रच विशेष मोहिमेत २३ सप्टेंबरला जास्तीत लसीकरण करण्यासाठी नियोजन केले आहे. सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला हातभार लावायचा आहे. ५० हजार डोस उपलब्ध असून, २३ हजार डोसचे नियोजन विशेष मोहिमेत केले आहे. आणखी काही असे सत्र घेतले जाणार आहेत.