शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

आता आषाढातही शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

हिंगोली : कोरोना महामारीने सर्वांचेच गणित बिघडवून टाकले आहे. पूर्वी आषाढ महिना हा लग्नासाठी वर्ज्य मानला जायचा. परंतु, हल्ली ...

हिंगोली : कोरोना महामारीने सर्वांचेच गणित बिघडवून टाकले आहे. पूर्वी आषाढ महिना हा लग्नासाठी वर्ज्य मानला जायचा. परंतु, हल्ली आषाढ महिन्यातही विवाह कार्य होऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे.

पूर्वी म्हणजे गत ४० वर्षांपूर्वी आषाढ महिना सोडून इतर महिन्यांमध्ये विवाहतिथी असेल तर ती काढून विवाहकार्य उरकून घेतली जायची. परंतु, हल्ली शास्त्राधाराला धरून तिथी काढली जात नाही, असेच दिसते. गत काही वर्षांपूर्वी आषाढ महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडायचा. त्यावेळेस पावसामध्ये विवाहकार्य करणे म्हणजे मोठे जिकरीचे होऊन बसायचे. ओढे - नाल्यांना पूर आला की, वऱ्हाडी मंडळींना विवाहस्थळी येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. विशेष सांगायचे झाल्यास त्यावेळेस विवाहकार्य करण्यासाठी आतासारखी मंगल कार्यालये नसायची. हेही कारण आषाढ महिन्यात विवाह कार्य न होण्यामागचे सांगितले जाते.

सद्यस्थितीत पाऊसपाणीही पूर्वीसारखे राहिली नाही. आजमितीस शहराच्या ठिकाणी व गावोगावी मंगल कार्यालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगल कार्यालय नसेल तर टेंट टाकून विवाह कार्य आटोपून घेतली जात आहेत. हल्ली नोकरीमुळे कुणालाही वेळ मिळत नसल्यामुळे तारीख पाहून विवाहकार्य आटोपून घेतले जात आहे. आषाढ महिन्याला ११ जुलै रोजी प्रारंभ झाला आहे. आषाढ महिन्यात १३, १८, २२, २५, २६, २८ आणि २९ अशा तारखा शुभ विवाहाच्या आहेत.

प्रतिक्रिया

आषाढ महिना हा शास्त्राप्रमाणे विवाह कार्यासाठी वर्ज्यच मानला जातो. परंतु, वधू-वरांच्या पित्यांनी विवाहाची तारीख विचारली तर सांगितली जाते. यावर्षी आषाढ महिन्यात ७ तिथी आहेत. पंचांगकर्त्यांनी दोन मुहूर्त काढले असून, यात मुख्यकाल आणि आपत्काल यांचा समावेश केला आहे.

- रेणुकादासगुरु कुलकर्णी, पुरोहित

शास्त्राप्रमाणे आषाढ महिन्यात विवाहकार्य करता येत नाही. पूर्वी आषाढ महिन्यात विवाहकार्य लावली जात नव्हती. आता मात्र आषाढ महिना न पाळता तारखेप्रमाणे विवाहकार्य आटोपून घेतली जात आहेत, असे पुरोहिताने सांगितले.

मंगल कार्यालय बुक...

कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी कोरोनाच्या नियमात काही शिथिलता करण्यात आलेली नाही. कोरोनाचे नियम पाळत विवाह कार्य पार पाडणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वऱ्हाडी मंडळींना मास्क घालणेही आवश्यक आहे. याचबरोबर सामाजिक अंतर ठेवणे तितकेच गरजेचे आहे. मंगल कार्यालयात विवाहकार्य करायचे झाल्यास सर्व अटींची पूर्तता करावी लागेल, असे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत, असेही मंगल कार्यालयातून सांगण्यात येत आहे.

५० व्यक्तिनाच परवानगी...

कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी शासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम मंगल कार्यालयांना पाळणे हे बंधनकारक केले आहे. वऱ्हाडी मंडळी ५० व्यक्तींपेक्षा अधिक असतील ते चालणार नाही, अशा सूचनाही मंगल कार्यालयांना दिल्या गेल्या आहेत. यामुळे बहुतांशजण विवाह हे घरीच साध्या पद्धतीने उरकून घेेत आहेत. मोकळी जागा असेल तर त्या जागेच्या मालकाकडून परवानगी घेतली जात आहे.

-