शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

मावेजा प्रकरणात दोन अधिकाऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:29 IST

पैनगंगा नदीवर वाशिम व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर उकळी बॅरेजमध्ये गेलेल्या जमिनीचा मावेजा देण्यास विलंब करणाºया वाशिम लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता व भूमिअभिलेख उपाधीक्षक हिंगोली यांना जिल्हाधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तर शासनाकडे कारवाईची शिफारस करण्याचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पैनगंगा नदीवर वाशिम व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर उकळी बॅरेजमध्ये गेलेल्या जमिनीचा मावेजा देण्यास विलंब करणाºया वाशिम लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता व भूमिअभिलेख उपाधीक्षक हिंगोली यांना जिल्हाधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तर शासनाकडे कारवाईची शिफारस करण्याचा इशारा दिला आहे.दोन दिवसांपूर्वी उकळी बॅरेजमध्ये जमिनी गेलेल्या शेतकºयांना मावेजा मिळाला नसल्याने जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न झाला. त्यानंतर बॅरेजेसच्या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाºयांनी पूर्ण केली आहे.पैनगंगा नदीवर वाशिम लघुपाटबंधारे विभागाकडून मागील सहा ते सात वर्षांत ११ बॅरेज उभारण्यात आले. वाशिम व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांना याचा फायदा आहे. तसेच दोन्ही जिल्ह्यांतील शेतकºयांच्या जमिनी प्रकल्पाखाली गेल्या. यात काही जमीन परस्पर लघुपाटबंधारेने खरेदी केली. तर इतर जमिनीचे रीतसर भूसंपादन केले. यात अनेक ठिकाणच्या तक्रारी होत्या. जमीन बुडित क्षेत्रात जात नसताना भूसंपादित करून मावेजा दिल्याच्या तक्रारींनंतरही कारवाई मात्र काहीच झाली नाही. यात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनीही अवाजवी भूसंपादनाची शंका व्यक्त करून विभागीय आयुक्तांना पत्र देत आपल्या स्तरावरून चौकशी समिती नेमण्याची शिफारस केली होती. मात्र तेव्हा काहीच झाले नाही.दरम्यान, मागील महिनाभरापासून उकळी येथील ११ शेतकरी मावेजासाठी आक्रमक झाले होते. मावेजा न मिळाल्यास जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. मुळात यात वाशिम लघुपाटबंधारे विभागाने मागील दोन वर्षांपासून दिरंगाई चालविली होती. ४ आॅक्टोबर २0१६ रोजी भूसंपादन अहवाल प्राप्त झाला होता. नंतर १६ फेब्रुवारीपर्यंत लीगल सर्च रिपोर्टचा पत्ता नव्हता. तर ९६ आर. जमिनीचे अवाजवी भूसंपादन होत असल्याचा मुद्दाही अनिर्णित होता. त्यामुळे भूमिअभिलेख व वाशिम लघुपाटबंधारेने यात लक्ष घालण्याच्या वारंवार सूचना दिल्या तरीही कोणतीच कारवाई होत नव्हती. शेवटी जिल्हा प्रशासनाने यात ९६ आर. जमीन कमी करून शासनाचे नुकसान टाळले. यात जवळपास १५ शेतकºयांची २ हेक्टर १९ आर जमीन संपादित झाली आहे. तर ४५ लाखांचा मावेजा लागणार आहे. या दोन्ही विभागांच्या दुर्लक्षामुळे शेतकºयांना मात्र मावेजा मिळत नव्हता. त्यामुळे १९ जून २0१८ रोजी शेतकºयांनी जलसमाधीचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी वाशिम लघुपाटबंधारेची इतर भूसंपादनाची रक्कम वळती करून या शेतकºयांना मावेजा देण्याचा आदेश दिला. मात्र मागील दोन वर्षांच्या रक्कमेवर व्याजाची मागणी व जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी आदींवर कारवाईची मागणी करीत जलसमाधी आंदोलनस्थळी तसा प्रयत्नही केला. अजूनही हे प्रकरण पूर्णपणे शांत झाले नसले तरीही वस्तूनिष्ठ अहवाल तयार करून यातील दोषींवर कारवाईची शिफारस जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार