शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

जलेश्वर तलावाच्या क्षेत्रातील १९५ अतिक्रमणधारकांना तहसीलची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 21:08 IST

नवीन अतिक्रमणांकडे दुर्लक्ष 

ठळक मुद्देनगरपालिकेकडून तंबी कारवाईसाठी हालचाली सुरु

हिंगोली : जलेश्वर तलावाच्या पाळूवर व बुडित क्षेत्रावर अतिक्रमण करणाऱ्या १९५ जणांना तहसील कार्यालयाकडून पुन्हा एकदा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र नवीन अतिक्रमण करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई तहसीलने केली नाही. नगरपालिकेच्या अभियंत्यांनी पाहणी करून हे अतिक्रमण हटविण्यास सांगितल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

हिंगोली नगरपालिकेच्या वतीने यापूर्वी जलेश्वर तलावातील गाळ काढण्याची व सुशोभिकरणाची काही कामे झाली होती. मात्र ती टिकली नाहीत. दोन वर्षांपासून पुन्हा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणाचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र यात आधी अतिक्रमणधारकांची बाधा येत होती. त्यांनी तेव्हापासून अतिक्रमण हटविण्यास नोटिसा बजावल्या जात आहेत. मात्र सुशोभिकरणाचा प्रस्ताव मंजूर नसल्याने याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. दुसरीकडे अतिक्रमणधारकांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यांच्यासाठी जागा घेण्याची तयारीही नगरपालिका करीत होती. मात्र अव्वाच्या सव्वा दराचे प्रस्ताव सभेसमोर आल्याने ते फेटाळले गेले. आता न.प.ने पुन्हा सहा एकर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले. त्यातून जुन्या अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन होईल. तर नवे काढून टाकण्यास सांगितले असून यासाठी अभियंत्यांना तलाबकट्टा भागात पाठविले होते, असे ते म्हणाले. तर या भागात यापुढे अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्यास न.प.च्या यंत्रणेलाही सांगितले.

आमदारांना भेटले शिष्टमंडळया नोटिसा मिळाल्यानंतर सैरभैर झालेल्या अतिक्रमणधारकांनी आज आ.तान्हाजी मुटकुळे यांची भेट घेऊन आपले गाºहाणे मांडले. त्यानंतर या अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाबाबत मुटकुळे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी चर्चा केली. लवकरच या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता मिळू शकते, असे संकेत मिळाल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांचीही उपस्थिती होती.