शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चार उमेदवारांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:43 IST

लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील आपला निवडणूक प्रचार खर्च सादर न केल्याने या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक पहिल्या तपासणीत खर्च सादर केलाच नाही

नांदेड : लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील आपला निवडणूक प्रचार खर्च सादर न केल्याने या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे चित्र उमेदवारी मागे घेतल्यानंतर २९ मार्च रोजी स्पष्ट झाले. नांदेड लोकसभा मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांकडून होणारा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत उमेदवारांना ७० लाख रुपये खर्चापर्यंतची मर्यादा आहे. हा खर्च वेळोवेळी सादर करावा लागणार आहे. उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी ५ एप्रिल रोजी करण्यात आली.या तपासणीदरम्यान १४ उमेदवारांपैकी समाजवादी पार्टीचे अब्दुल समद, अपक्ष उमेदवार शिवानंद देशमुख, रणजित देशमुख आणि अशोक चव्हाण या चार उमेदवारांनी पहिल्या तपासणीत निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या खर्चाचे विवरण निवडणूक विभागाकडे सादर केलेच नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिाित्व कायदा १९५१ च्या (७७) कलमान्वये या चार उमेदवारांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये खर्च सादर करण्यात आला नाही, याबाबत विचारणा केली आहे.दरम्यान, उमेदवारांनी प्रचारादरम्यान केलेल्या खर्चाची दुसरी तपासणी १० एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे या दुसऱ्या तपासणीत तरी हे उमेदवार आपला खर्च सादर करतील का? याकडे लक्ष लागले आहे.खर्चाचा हिशेब जुळविताना कसरत

  • निवडणूक आयोगाने निवडणुकीत प्रत्येक गोष्टीचे दर निश्चित केले आहेत़ त्यामध्ये जेवणातील पदार्थ,वाहने, प्रचाराचे साहित्य यातील प्रत्येक बाबींचा समावेश आहे़ त्यामुळे उमेदवारांना खर्चाचा हिशेब सादर करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे़ अवास्तव खर्च टाळण्यासाठी प्रत्येक उमेदवार कटाक्षाने लक्ष ठेवून आहे़ आचारसंहिता पथकही उमेदवार कुठे अन् किती खर्च करीत आहेत, याची तपासणी करीत आहे़ त्यामुळे उमेदवार अन् त्यांच्या कार्यकर्त्यांची खर्च जुळविताना चांगलीच दमछाक होत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे़
  • भाजपाचे माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे खा़अशोकराव चव्हाण व डी़पी़सावंत यांची तक्रार केली आहे़ खा़ चव्हाण यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेडातील सभा रद्द झाल्याचे आचारसंहिता भंग करणारे विधान केले असल्याचा आरोप केला़ तर डी़पी़सावंत यांनी चिखलीकरांच्या विरोधात अशोकराव खरे लीडर तर भाजपाचा उमेदवार दारुचे डीलर असे वक्तव्य केल्याचा आरोप पोकर्णा यांनी केला आहे़ तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे़
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग