शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

..अन् रोपवाटिकेतच नाही ‘रोपांचा’ ताळमेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:48 IST

राज्यभर सध्या मोठ्या उत्साहात शतकोटी वृक्षलागवड मोहिम जोरात सुरू आहे. मात्र हिंगोली येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत नेमकी किती रोपे आहेत, उगवण किती रोपांची केली, याचाच ताळमेळच नसल्याचे दिसून आले आहे. शिवाय नागरिकांतून रोपे नेण्यासाठी प्रतिसादही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. वन विभागाने जागो-जागी उभारलेल्या स्टॉलवरही रोपे खरेदीसाठी गर्दी दिसत नाही.

दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यभर सध्या मोठ्या उत्साहात शतकोटी वृक्षलागवड मोहिम जोरात सुरू आहे. मात्र हिंगोली येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत नेमकी किती रोपे आहेत, उगवण किती रोपांची केली, याचाच ताळमेळच नसल्याचे दिसून आले आहे. शिवाय नागरिकांतून रोपे नेण्यासाठी प्रतिसादही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. वन विभागाने जागो-जागी उभारलेल्या स्टॉलवरही रोपे खरेदीसाठी गर्दी दिसत नाही.पर्यावरण संतुलनासाठी शासनाकडून वृक्षलागवडीवर भर दिला जात आहे. शासनाच्या प्रत्येक विभागाला वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी व नागरिकही यामध्ये हिरिरीने सहभाग घेत आहेत. परंतु जिल्ह्यात वृक्षलागवडीसंदर्भात वन विभागाकडे माहितीच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. हिंगोली येथील खटकाळी बायपास परिसरात वन विभागाची रोपवाटिका आहे. दरवर्षी रोपवाटिकेत जवळपास पावणेदोन लाख रोपांची उगवण केली जाते. यावर्षी लाखो रोपांची लागवड करण्यात आल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मात्र या रोपवाटिकेत किती रोपांची उगवण केली, किती वाटप झाली, यासह इतर माहितीच संबधित अधिकाऱ्याकडे उपलब्ध नसल्याचे शुक्रवारी दिसून आले. त्यामुळे शतकोटी वृक्षलागवड नावालाच तर होत नाही, असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असून, रोपवाटिकेतील नियोजन लावणेही महत्त्वाचे आहे.३१ जुलै अहवाल मिळेल४रोपवाटिकेतील रोपांची संख्या, उगवण केलेली रोपे, वाटप झालेली रोपे अशी माहिती ३१ जुलैला एकत्रित केली जाणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी बी. बी. देवरे यांनी सांगितले. तसेच येथील महिला कामगारांचे मागील चार महिन्यांपासून मानधन रखडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कामगारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.बिया आणून रोपे तयार४रोपवाहिकेतील महिला कामगारांनी बिया आणून लाखो रोपे तयार केली. जिवापाड रोपांची कामगारांकडून देखरेख केली जात असल्याचे दिसून आले. सध्या लिंब रोपाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या रोपवाहिकेत बांबू, शिसम, चिंच, शिसू, कवठ, बेल, पिंपळ, गोंदन, हिरडा, कड, करंज, लिंब अशी जातवार रोपे असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागNatureनिसर्ग