शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

..अन् रोपवाटिकेतच नाही ‘रोपांचा’ ताळमेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:48 IST

राज्यभर सध्या मोठ्या उत्साहात शतकोटी वृक्षलागवड मोहिम जोरात सुरू आहे. मात्र हिंगोली येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत नेमकी किती रोपे आहेत, उगवण किती रोपांची केली, याचाच ताळमेळच नसल्याचे दिसून आले आहे. शिवाय नागरिकांतून रोपे नेण्यासाठी प्रतिसादही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. वन विभागाने जागो-जागी उभारलेल्या स्टॉलवरही रोपे खरेदीसाठी गर्दी दिसत नाही.

दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यभर सध्या मोठ्या उत्साहात शतकोटी वृक्षलागवड मोहिम जोरात सुरू आहे. मात्र हिंगोली येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत नेमकी किती रोपे आहेत, उगवण किती रोपांची केली, याचाच ताळमेळच नसल्याचे दिसून आले आहे. शिवाय नागरिकांतून रोपे नेण्यासाठी प्रतिसादही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. वन विभागाने जागो-जागी उभारलेल्या स्टॉलवरही रोपे खरेदीसाठी गर्दी दिसत नाही.पर्यावरण संतुलनासाठी शासनाकडून वृक्षलागवडीवर भर दिला जात आहे. शासनाच्या प्रत्येक विभागाला वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी व नागरिकही यामध्ये हिरिरीने सहभाग घेत आहेत. परंतु जिल्ह्यात वृक्षलागवडीसंदर्भात वन विभागाकडे माहितीच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. हिंगोली येथील खटकाळी बायपास परिसरात वन विभागाची रोपवाटिका आहे. दरवर्षी रोपवाटिकेत जवळपास पावणेदोन लाख रोपांची उगवण केली जाते. यावर्षी लाखो रोपांची लागवड करण्यात आल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मात्र या रोपवाटिकेत किती रोपांची उगवण केली, किती वाटप झाली, यासह इतर माहितीच संबधित अधिकाऱ्याकडे उपलब्ध नसल्याचे शुक्रवारी दिसून आले. त्यामुळे शतकोटी वृक्षलागवड नावालाच तर होत नाही, असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असून, रोपवाटिकेतील नियोजन लावणेही महत्त्वाचे आहे.३१ जुलै अहवाल मिळेल४रोपवाटिकेतील रोपांची संख्या, उगवण केलेली रोपे, वाटप झालेली रोपे अशी माहिती ३१ जुलैला एकत्रित केली जाणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी बी. बी. देवरे यांनी सांगितले. तसेच येथील महिला कामगारांचे मागील चार महिन्यांपासून मानधन रखडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कामगारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.बिया आणून रोपे तयार४रोपवाहिकेतील महिला कामगारांनी बिया आणून लाखो रोपे तयार केली. जिवापाड रोपांची कामगारांकडून देखरेख केली जात असल्याचे दिसून आले. सध्या लिंब रोपाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या रोपवाहिकेत बांबू, शिसम, चिंच, शिसू, कवठ, बेल, पिंपळ, गोंदन, हिरडा, कड, करंज, लिंब अशी जातवार रोपे असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागNatureनिसर्ग