शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कयाधूचे थेंबभरही पाणी नांदेडला नेऊ देणार नाही : शिवाजी माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST

माने म्हणाले की, नांदेड येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी पाॅवर पॉइंट सादरीकरण केले. यामध्ये ...

माने म्हणाले की, नांदेड येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी पाॅवर पॉइंट सादरीकरण केले. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात खरबी येथील उच्च पातळी बंधाऱ्यातून पैनगंगा नदीत पाणी वळविण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यापूर्वी त्यांनी सापळी धरणाच्या माध्यमातून हे पाणी वळविण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा खरबी बंधाऱ्यातून पाणी वळविण्याचे मनसुबे आहेत. आधीच हिंगोली जिल्ह्यावर सिंचन अनुशेषातही अन्याय झाला आहे. ४०००० हेक्टरचा अनुशेष असताना साडेसतरा हजार हेक्टरचा मंजूर झाला आहे. त्यावर शासन काहीच विचार करीत नाही, उलट येथील पाणी पळवून हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट बनविण्याचा घाट घातला जात आहे. तो कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा माने यांनी दिला आहे. कायम नांदेड जिल्ह्याचा विचार करणाऱ्या चव्हाण यांनी हिंगोली जिल्ह्यालाही समान वागणूक देणे गरजेचे आहे. मतांचे राजकारण करताना इतरांचे जीवन प्रभावित होणार नाही, याची काळजी नेता म्हणून त्यांनी घेणे अपेक्षित आहे.