शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
3
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
4
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
5
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
6
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
7
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
8
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
9
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
10
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
11
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
12
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
13
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
14
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
15
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
16
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
17
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
18
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
19
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
20
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

उद्योग नसलेला ‘हिंगोली’ जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:50 IST

जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नाकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. सुविधांचा अभाव, भूखंड नसल्याने उद्योग सुरू होत नाहीत. तर जिल्ह्यात सुरू आहेत तेही उद्योग सध्या दुष्काळामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

दयाशिल इंगोले ।हिंगोली : जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नाकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. सुविधांचा अभाव, भूखंड नसल्याने उद्योग सुरू होत नाहीत. तर जिल्ह्यात सुरू आहेत तेही उद्योग सध्या दुष्काळामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.हिंगोली जिल्ह्यातील आहे त्या उद्योगांनाच घरघर लागली आहे. दुष्काळामुळे पिके गेली शेतकरी हतबल झाला.त्यामुळे जिनींग व दालमिल अडचणीत आल्या आहेत. उद्योजकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागासलेल्या हिंगोली जिल्ह्याला ना उद्योग जिल्हा म्हणून घोषित केले होते. परंतु सध्या जिल्हा उद्योगात प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचे भासिवले जात आहे. एमआयडीसी व सहकारी औद्यागिक वसाहतीमधील भुखंडावर उभारलेले उद्योग अस्तीत्त्वात आहेत का? हेही सांगणे कठीण आहे. हिंगोली येथे २७३ पैकी २६६ भूखंड वाटप आहेत. येथे १९८ भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र केवळ ४० भूखंडावरच उद्योग उभारले आहेत. तर वसमत ४० पैकी ३८ भूखंड वाटप आहेत. येथे २२ भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र केवळ १० ठिकाणीच उद्योग सुरू आहेत. कळमनुरी ३२ पैकी १२ भूखंड वाटप असून एकाच ठिकाणी उद्योग आहे. हिंगोली येथील सहकारी औद्योगिक वसाहतमधील ६६ पैकी ६६ भूखंड वाटप केले आहेत. या ठिकाणी ३० भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ८ भूखंडावर उद्योग सुरू आहेत.असोसिएशनचा पाठपुरावाजिल्ह्यातील उद्योगासंदर्भात येणाऱ्या अडी-अडचणी व समस्यांवर हिंगोली जिल्हा इंडस्ट्रीज असोसिएशन मागील अनेक वर्षांपासून लढा देत आहे. परंतु असोसिएशनच्या मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचे असोसिएशनचे सचिव नंदकिशोर तोष्णीवाल यांनी सांगितले. उद्योग घटकांचा आकडा फुगविला जात असून भविष्यात याचे उद्योग व बेरोजगांवर विपरित परिणाम होणार असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करते. पुर्वी सामुहिक प्रोत्सहान योजना २००७ मध्ये भांडवली अनुदान एक रक्कमी मिळत असे. त्यामुळे उद्योगाला चालना मिळायची.

टॅग्स :Hingoliहिंगोलीbusinessव्यवसाय