शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

उद्योग नसलेला ‘हिंगोली’ जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:50 IST

जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नाकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. सुविधांचा अभाव, भूखंड नसल्याने उद्योग सुरू होत नाहीत. तर जिल्ह्यात सुरू आहेत तेही उद्योग सध्या दुष्काळामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

दयाशिल इंगोले ।हिंगोली : जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नाकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. सुविधांचा अभाव, भूखंड नसल्याने उद्योग सुरू होत नाहीत. तर जिल्ह्यात सुरू आहेत तेही उद्योग सध्या दुष्काळामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.हिंगोली जिल्ह्यातील आहे त्या उद्योगांनाच घरघर लागली आहे. दुष्काळामुळे पिके गेली शेतकरी हतबल झाला.त्यामुळे जिनींग व दालमिल अडचणीत आल्या आहेत. उद्योजकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागासलेल्या हिंगोली जिल्ह्याला ना उद्योग जिल्हा म्हणून घोषित केले होते. परंतु सध्या जिल्हा उद्योगात प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचे भासिवले जात आहे. एमआयडीसी व सहकारी औद्यागिक वसाहतीमधील भुखंडावर उभारलेले उद्योग अस्तीत्त्वात आहेत का? हेही सांगणे कठीण आहे. हिंगोली येथे २७३ पैकी २६६ भूखंड वाटप आहेत. येथे १९८ भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र केवळ ४० भूखंडावरच उद्योग उभारले आहेत. तर वसमत ४० पैकी ३८ भूखंड वाटप आहेत. येथे २२ भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र केवळ १० ठिकाणीच उद्योग सुरू आहेत. कळमनुरी ३२ पैकी १२ भूखंड वाटप असून एकाच ठिकाणी उद्योग आहे. हिंगोली येथील सहकारी औद्योगिक वसाहतमधील ६६ पैकी ६६ भूखंड वाटप केले आहेत. या ठिकाणी ३० भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ८ भूखंडावर उद्योग सुरू आहेत.असोसिएशनचा पाठपुरावाजिल्ह्यातील उद्योगासंदर्भात येणाऱ्या अडी-अडचणी व समस्यांवर हिंगोली जिल्हा इंडस्ट्रीज असोसिएशन मागील अनेक वर्षांपासून लढा देत आहे. परंतु असोसिएशनच्या मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचे असोसिएशनचे सचिव नंदकिशोर तोष्णीवाल यांनी सांगितले. उद्योग घटकांचा आकडा फुगविला जात असून भविष्यात याचे उद्योग व बेरोजगांवर विपरित परिणाम होणार असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करते. पुर्वी सामुहिक प्रोत्सहान योजना २००७ मध्ये भांडवली अनुदान एक रक्कमी मिळत असे. त्यामुळे उद्योगाला चालना मिळायची.

टॅग्स :Hingoliहिंगोलीbusinessव्यवसाय