शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवन मिशनमध्ये होणार ३६१ गावांत नवीन योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:21 IST

हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या नव्या कामांना अजूनही प्रारंभ नाही. यापूर्वी तयार केलेला आराखडा आता रद्द झाला असून, नवीन आराखडा ...

हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या नव्या कामांना अजूनही प्रारंभ नाही. यापूर्वी तयार केलेला आराखडा आता रद्द झाला असून, नवीन आराखडा सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये आता ३६१ गावांत पूर्णपणे नळयोजना नसल्याने, नवीन नळयोजना घेण्यासाठी आराखड्याला मंजुरी मिळाली. मात्र, या गावांतील योजनांचे अंदाजपत्रके तयार नाहीत. ते तयार करण्यासाठी संबंधित तालुक्यातील कनिष्ठ अभियंत्यांना आदेशित करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात दोन अभियंत्यांची यासाठी नियुक्ती केली आहे. यामध्ये जलस्रोत, पम्पिंग स्टेशन, उद्धरण वाहिनी, पाण्याची टाकी, अंतर्गत वितरण व्यवस्था आदी बाबींचा समावेश करून, दरडोई ५५ लीटर पाण्याची व्यवस्था करायची आहे. या नवीन योजना २०२४ पर्यंत पूर्ण करायच्या आहेत. यामध्ये २५ लाखांपर्यंतची योजना जि.प. स्तरावर, २.५ कोटींपर्यंत अधीक्षक अभियंता, तर त्यापुढील मंत्रालय स्तरावर जाणार आहे. तसेही मंत्रालय छाननी समितीकडे सगळेच प्रस्ताव पाठवावे लागणार आहे. २,६८५ रुपये दरडोई खर्च येत असल्यास, जि.प.च्या स्तरावर मान्यता देण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यापुढे गेल्यास पुढील निकष पाळावे लागतात.

अनेक गावांत गेल्या अनेक वर्षांपासून योजनेची प्रतीक्षा आहे. त्यांना जलजीवन मिशनमध्ये आधार मिळणार आहे. दोन दिवसांपूर्वी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या विभागाची बैठक घेऊन प्रस्ताव सादर करण्यासाठी २० दिवसांची मुदत दिली. त्यात सध्या जलस्रोत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यावरूनच पुढील बाबींची निश्चितता होणार आहे.

२०७ गावांत नळजोडणीचे प्रस्ताव

आता दरडोई ४० ऐवजी ५५ लीटरचा निकष आल्यानंतर, अनेक गावांत नवीन कामे प्रस्तावित केली आहेत. यामध्ये नळजोडण्यांच्या कामांचाच समावेश आहे. ज्यांच्या नळजोडण्या शिल्लक राहिल्या, अशांना निधी दिला जाणार आहे. अशा ठिकाणी नवीन स्रोत किंवा वाहिनीची गरज असल्यास त्याचाही सर्व्हे करण्यात येणार आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात ३०८ गावांत ४,६४६ नवीन नळजोडण्या, सेनगावातील २४ गावांत २,१६४, कळमनुरीतील ५० गावांत ७,३३८, औंढ्यातील ३८ गावांत ३,४४१, वसमत तालुक्यात ५७ गावांत ७,१६० नळजोडण्या प्रस्तावित आहेत. एकूण २४ हजार ७४९ नळजोडण्या प्रस्तावित आहेत.

नवीन नळयोजना प्रस्तावसंख्या

औंढा नागनाथ ६४

वसमत ७३

हिंगोली ८१

कळमनुरी ६४

सेनगाव ७९