शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

समृद्ध, शक्तिशाली राष्ट्र उभारणीसाठी मातृभाषेतून शिक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

हिंगोली : समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र उभारणीसाठी मातृभाषेतून शिक्षणाची गरज असून, त्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुनीश्री ...

हिंगोली : समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र उभारणीसाठी मातृभाषेतून शिक्षणाची गरज असून, त्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुनीश्री १०८ अक्षय सागर महाराज यांनी केले.

३० जानेवारी रोजी येथील जिल्हा परिषद शाळा गणेशवाडी येथे वात्सल्यमूर्ती मुनीश्री १०८ अक्षय सागर महाराज यांचे प्रवचन झाले. यावेळी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, नाभिराज मास्ट, डॉ. नितीन साकळे, आशिष पिंगळकर, प्रगतिशील शेतकरी किशोर मास्ट, केंद्रप्रमुख कुलदीप मास्ट, मुख्याध्यापक निर्मला चौधरी, भास्कर लांडगे, प्रणीता देवकर, सीमा गवळी यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी जीवन आणि व्यक्तिमत्त्व विकास या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

यावेळी मुनीश्री अक्षय सागर महाराज म्हणाले, विद्यार्थी अवस्था खऱ्या आर्थाने जीवनाचा पाया आहे. पाया मजबूत असेल तर इमारत चांगली उभी राहाते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देऊन विद्यार्थी जीवनाचा पाया मजबूत केला पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांकडे जिद्द, चिकाटी असली पाहिजे. केवळ परिस्थितीचा बाऊ करण्यापेक्षा परिस्थितीवर मात करून त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द व जिज्ञासूवृत्ती जोपासणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर आई, वडील अपेक्षांचे ओझे लादत आहेत. मात्र त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना करिअर करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला पाहिजे. त्यांच्या आवडत्या क्षेत्रातूनच विद्यार्थी पुढील काळात आदर्श नागरिक होऊ शकतील. शिक्षण हे आमचे साध्य नाही तर साधन आहे याकडे पालकांनीही लक्ष दिले पाहिजे. सध्या देशात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचा कल प्रचंड वाढला आहे. मात्र त्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान होत असून, त्याकडे सर्वांनीच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मुनीश्री अक्षय सागर महाराज यांनी सांगितले.