शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

समृद्ध, शक्तिशाली राष्ट्र उभारणीसाठी मातृभाषेतून शिक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

हिंगोली : समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र उभारणीसाठी मातृभाषेतून शिक्षणाची गरज असून, त्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुनीश्री ...

हिंगोली : समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र उभारणीसाठी मातृभाषेतून शिक्षणाची गरज असून, त्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुनीश्री १०८ अक्षय सागर महाराज यांनी केले.

३० जानेवारी रोजी येथील जिल्हा परिषद शाळा गणेशवाडी येथे वात्सल्यमूर्ती मुनीश्री १०८ अक्षय सागर महाराज यांचे प्रवचन झाले. यावेळी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, नाभिराज मास्ट, डॉ. नितीन साकळे, आशिष पिंगळकर, प्रगतिशील शेतकरी किशोर मास्ट, केंद्रप्रमुख कुलदीप मास्ट, मुख्याध्यापक निर्मला चौधरी, भास्कर लांडगे, प्रणीता देवकर, सीमा गवळी यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी जीवन आणि व्यक्तिमत्त्व विकास या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

यावेळी मुनीश्री अक्षय सागर महाराज म्हणाले, विद्यार्थी अवस्था खऱ्या आर्थाने जीवनाचा पाया आहे. पाया मजबूत असेल तर इमारत चांगली उभी राहाते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देऊन विद्यार्थी जीवनाचा पाया मजबूत केला पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांकडे जिद्द, चिकाटी असली पाहिजे. केवळ परिस्थितीचा बाऊ करण्यापेक्षा परिस्थितीवर मात करून त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द व जिज्ञासूवृत्ती जोपासणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर आई, वडील अपेक्षांचे ओझे लादत आहेत. मात्र त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना करिअर करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला पाहिजे. त्यांच्या आवडत्या क्षेत्रातूनच विद्यार्थी पुढील काळात आदर्श नागरिक होऊ शकतील. शिक्षण हे आमचे साध्य नाही तर साधन आहे याकडे पालकांनीही लक्ष दिले पाहिजे. सध्या देशात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचा कल प्रचंड वाढला आहे. मात्र त्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान होत असून, त्याकडे सर्वांनीच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मुनीश्री अक्षय सागर महाराज यांनी सांगितले.