शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्हा समन्वयच्या बैठकीत गाजले राष्ट्रीय महामार्ग व पीकविम्याचे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

खासदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला ...

खासदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला जि. प. अध्यक्ष गणाजी बेले, आमदार संतोष बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अधिकारी संजय दैने, किरण गिरगावकर, मिलिंद पोहरे, दिशा समिती सदस्य उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, कृषी, पीकविमा, आरोग्य, शिक्षण, , राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अधिक सजग राहून सर्वसामान्य जनतेला सुविधा पुरविल्या पाहिजेत असे ते म्हणाले. आजच्या बैठकीत महावितरण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि कृषी विभागाशी संबंधित अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश सभागृहाला दिले. सर्वसामान्य जनतेची कामे करताना अधिकाऱ्यांचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, असेही पाटील म्हणाले, पीकविम्याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारीवरून कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावले. पीकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, येत्या आठ दिवसांत तालुकास्तरावर विमा कंपनीचे कार्यालय सुरू करून स्थनिक लोकप्रतिनिधीला माहिती सादर करा, ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार करा ही अट रद्द करा, पीक पैसेवारी, आणेवारी आणि पीक कापणीच्या चित्रीकरणाबाबत समित्या स्थापन करा आणि याबाबत तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

पालकमंत्री पाणंद योजनेचे ४५ लाख परत गेले. ३० मार्चला एकही प्रस्ताव नसल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे यंदा तरी मग्रारोहयो व इतर योजनांतून निधी खर्च होईल, हे पाहण्यास बजावले.

सार्वजनिक विहिरींचे ६० कोटी रखडले

सार्वजनिक विहिरींची शेकडो कामे झाली. त्यात कुशलच्या निधीचा अजून पत्ता नाही. आता हा निधी मिळाला नसल्याने संबंधित ग्रामपंचायती अडचणीत सापडल्याचा मुद्दा आ.बांगर यांनी मांडला. त्यावर शासनाकडे मागणी केली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी उडवाउडवीची उत्तरे देऊन तहसीलदार रस्ते मोकळे करीत नाहीत, असेही बांगर म्हणाले. तर सणासुदीचे दिवस असल्याने पूर्वसूचना दिल्याशिवाय वीज तोडू नये, अशी सूचना केली.

गोठ्यांचे प्रस्ताव दलालांमार्फत

मग्रारोहयोत गोठ्यांचे कितीही प्रस्ताव आले तरी चालतील, असे काही अधिकारी सांगतात. तर काहीजण दलालांमार्फतच प्रस्ताव स्वीकारत आहेत. त्यात पाच ते दहा हजारांचा फटका बसत असल्याचा आरोपही आ.संतोष बांगर यांनी केला. यात एकाच दिवसात सर्व प्रस्ताव मागवून मंजुरी का दिली जात नाही, असा सवाल आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केला.

कंत्राटदार कामे करतात की धर्मादायमध्ये होतात...

आ.तान्हाजी मुटकुळे यांनी कोळसा १३२ केव्हीमधील ट्रान्स्फाॅर्मर आठ महिन्यांपासून बंद आहे. नवे उपलब्ध झाले नाही. त्यामुळे यंदा सेनगाव तालुक्याचे सिंचनच होणार नसल्याचे सांगितले. तर कानडखेडा ३३ के.व्ही. उद्घाटनानंतरही सुरू नाही. शिवाय खेर्डा, दाती, कडोळी, देऊळगाव रामा उपकेंद्रांबाबतही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. तर अनेक ठिकाणी जीर्ण तारांचा प्रश्न असून जीवितहानी होईल, अशी भीती काहींनी व्यक्त केली. त्यावर नवीन कामांच्याही याच तक्रारी आहेत. गेल्यावर्षीच्या कामांचे पोल वाकतात, तारा तुटतात. महावितरणमध्ये कंत्राटदार पैसे घेऊन काम करतात की... धर्मादाय कारभार चालू आहे? दर्जा न सुधारल्यास काळ्या यादीत टाका, असेही खा.पाटील म्हणाले.