शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अरुंद रस्ते, अरुंद गल्लीमुळे वाहने चालविणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST

२०११च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी होती. त्यानंतर, त्यामध्ये जवळपास १ लाख ७९ ...

२०११च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी होती. त्यानंतर, त्यामध्ये जवळपास १ लाख ७९ हजार एवढी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येते. म्हणजे आजमितीस जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५७ हजार ९७३ एवढी झाली आहे, तर शहराची लोकसंख्या १ लाख ८५ हजार एवढी आहे. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती १ मे, १९९९ रोजी झाली. यापूर्वी हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये एक मोठा तालुका म्हणून कार्यरत होता. जिल्हा होऊन आजमितीस २२ वर्षे झाले आहेत, परंतु काही कायापालट झालेला दिसत नाही. नांदेड नाका ते गांधी चौक हा रस्ता जर सोडला, तर असा कोणताच मोठा रस्ता हिंगोली शहरात सध्यातरी अस्तित्वात नाही.

तहसील कार्यालय हे अकोला रोडवर असून, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शहराच्या बाजूस नव्याने थाटली गेली आहेत. नगरपालिका, बस स्थानक, अग्निशमन दल, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, पोलीस शहर वाहतूक कार्यालये शहरातून जाणाऱ्या अकोला रोडच्या बाजूलाच आहेत.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, कापड गल्ली, मच्छी मार्केट, भाजी मंडई, फुल मार्केट, जलेश्वर परिसर, सोनार गल्ली आदी ठिकाणी गाडी ठेवण्यावरून वादही निर्माण होतात. शहरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना गाडी कुठे ठेवावी, असा मोठा प्रश्न पडतो. बहुतांश वेळा गांधी चौक येथे वाहन उभे करून खरेदीसाठी दुकानावर यावे लागते. चारचाकी तर सोडा साधी दुचाकीही उभी करता येत नाही. सणावरांच्या दिवशी तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. शहर वाहतूक पोलीस आल्यानंतर वाहतूककोंडी सुरळीत होते. शहरातील गजबजलेल्या भागात सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत वर्दळ असते.

कापड गल्ली कसरतीचे ठिकाण

शहरातील कापड गल्ली हा भाग हिंगोली जिल्हा निर्मिती पूर्वीचा आहे. या ठिकाणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक कपडा खरेदीसाठी येतात. याच गल्लीच्या बाजूला सराफांची दुकाने आहेत. या ठिकाणी चारचाकी वाहन आले की, वाहतुकीची कोंडी होते. अशा वेळेस दुकानदार, तसेच ग्राहकांनाही त्रास सोसावा लागतो.

...तर वाहन मालकांवर कारवाई

वाहन रस्त्यात लावणे व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी १२२ कलमान्वये संबंधित वाहन चालकास २०० रुपये लावला जावू शकतो, परंतु कोणालाही ना दंडाची भीती, ना कारवाईची. बिनधास्तपणे कोणीही कुठेही वाहने उभी करीत आहेत. खरे पाहिले, तर नगरपालिकेने जागोजागी पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे, परंतु नगरपालिकेने अजून तरी पार्किंगची व्यवस्था केली नाही. सण, उत्सव आल्यास थोड्या प्रमाणात बांबू लावले जातात. नंतर मात्र ‘जैसे थे’ होऊन बसते. वेळीच नगरपालिकेने लक्ष देऊन पार्किंगचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.

शहराची लोकसंख्या - १ लाख ८५ हजार

दुचाकीची संख्या (जिल्ह्याची) १,५३,०९६

चारचाकींची संख्या (जिल्ह्याची) १४,६८२

-