शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत न्यावी - पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील बहुतांश रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. अजूनही बऱ्याच भागातील रेल्वे सेवा बंद असल्याने सर्व ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील बहुतांश रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. अजूनही बऱ्याच भागातील रेल्वे सेवा बंद असल्याने सर्व सामान्य नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिंगोली जिल्हा हा दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत येतो. या भागातील नागरिक शासकीय आणि मंत्रालयीन कामकाजासाठी मुंबई, औरंगाबाद ये-जा करत असतात. दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला-हिंगोली-पूर्ण रेल्वे मार्गावर देशाची आर्थिक राजधानी मुंबईकडे जाणारी एकही रेल्वे उपलब्ध नाही. यामुळे हिंगोली, वसमत आणि वाशिम येथील प्रवासी नागरिकांची कित्येक वर्षांपासून मोठी गैरसोय होत आहे. पण आता यावर लवकरात लवकर तोडगा काढून मुंबई-जालना जनशताब्दी ही रेल्वेगाडी हिंगोली किंवा वाशिमपर्यंत चालवण्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांच्याकडे केली.

ही रेल्वेगाडी १२ तास जालना येथे उभी असते. तो वेळ वापरून गाडी पुढे चालवावी, असे तंत्रशुद्ध कारण खा. पाटील यांनी रेल्वे समितीला पटवून दिले. त्यामुळे लवकरात लवकर रेल्वेकडून कार्यवाही होऊन ही मागणी पूर्ण होईल आणि हिंगोलीवासीयांना मुंबईकडे जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल, असेही खा. पाटील म्हणाले. अकोला-पूर्णा-हिंगोली-वसमत मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत रेल्वे विभागाशी अनेकवेळा मागणी करूनही कारवाई होत नसल्याचे खा. पाटील म्हणाले.

सध्या नांदेडवरून मुंबईकरिता रेल्वे सुरू आहेत, पण हिंगोली जिल्ह्याच्या भागातून रेल्वे सेवा सुरू नाहीत. त्यामुळेच सध्या जनशताब्दी एक्सप्रेस जालना ते मुंबई दरम्यान दररोज धावते. ही रेल्वेगाडी सकाळी ८ वाजता मुंबईकरिता निघते आणि रात्री पावणे आठच्या सुमारास जालन्यात येऊन १२ तास थांबते. त्यामुळे त्या गाडीला जालन्याऐवजी हिंगोली किंवा वाशिमपर्यंत वाढविण्यात आल्यास या भागातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाना सोयीचे ठरणार आहे. तसेच यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल. या सर्व बाबी लक्षात घेता यावर विचार करण्यात यावा. या बैठकीत खा. हेमंत पाटील यांनी देशातील महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प तत्काळ पूर्ण करावेत, नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा, हिंगोली येथे रेल्वेच्या मोकळ्या जागेत वेअर हाऊस बांधण्यात यावे आदी प्रश्न मांडले.

बैठकीला सदस्य संजीव मित्तल, राहुल जैन, एस.के. मोहंती, मुकेश निगम, राहुल अग्रवाल, संजय रस्तोगी, आर. एन. सिंघ आदी उपस्थित होते.