शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला ; यशस्वी उपचाराने रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरू असताना म्युकरमायकोसिस आजारानेही शिरकाव केला होता. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनही हतबल झाले ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरू असताना म्युकरमायकोसिस आजारानेही शिरकाव केला होता. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनही हतबल झाले होते. मात्र, योग्य उपचाराने सर्वच रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरांना यश आले असून, एकाही रुग्णाला जीव गमवावा लागला नाही. सध्या एकही रुग्ण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्व यंत्रणेला कामाला लावले होते. दररोज रुग्ण आढळून येत असल्याने कोरोना केअर सेंटर रुग्णांनी फुल्ल झाले होते. एकीकडे कोरोना रुग्ण बरे करण्यात आरोग्य विभागाची कसरत सुरू असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिस आजाराने जिल्ह्यात शिरकाव केला होता. त्यामुळे आरोग्य विभागाची दुहेरी कसरत सुरू होती. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १६ रुग्ण आढळून आले होते. मात्र, वेळीच त्यांच्यावर योग्य उपचार केल्याने १६ रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. रुग्णांना बरे करण्यासाठी आठ रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागली, तर एका गंभीर रुग्णाला नांदेड येथे हलविण्यात आले होते. कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गावर लागला आहे. येथील जिल्हा रुग्णालयात एकही रुग्ण सध्या दाखल नाही.

म्युकरमायकोसिस प्राथमिक लक्षणे

म्युकरमायकोसिस आजार दुर्मीळ असला तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिस होतो. डोळ्याखाली, तोंडात टाळूला, गालाखाली सूज येणे, दात ठिसूळ होणे ही प्राथमिक लक्षणे या आजाराची असल्याचे डॉ. फैसल खान यांनी सांगितले.

औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत असताना मेच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयातच इंजेक्शन व औषधी उपलब्ध होती. खाजगीमध्ये ही औषधी मिळत नव्हती. जिल्हा रुग्णालयाने औषधी व इंजेक्शनची मागणी केल्यानंतर मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली. सध्या जिल्ह्यात इंजेक्शन व औषधी मुबलक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, गंभीर रुग्ण असल्यास एका रुग्णाला किमान चार आठवडे इंजेक्शन द्यावे लागते.

आठ जणांवर शस्त्रक्रिया

म्युकरमायकोसिसचा शरीरात संसर्ग लवकर होतो. त्यामुळे हा संसर्ग डोळ्यांमार्फत मेंदूपर्यंत पाेहोचण्याची शक्यता असते. यातून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच शस्त्रक्रिया केल्यास रुग्णाचे प्राण वाचतात. अनेकवेळा संसर्ग जास्त झाल्यास डोळाही काढावा लागतो. सुदैवाने जिल्ह्यात एकाही रुग्णांचा डोळा काढून टाकण्याची गरज भासली नाही. केवळ फंगस काढण्यासाठी आठ रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागली.

ही घ्या काळजी

म्युकरमायकोसिस आजार होऊ नये, यासाठी प्रत्येकाने एकच मास्क आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस वापरू नये. तसेच मधुमेह नियंत्रणात राहील, याची काळजी घेतल्यास या आजारापासून बचाव करता येऊ शकतो.

जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे १६ रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. मधुमेह व इतर गंभीर आजार असलेल्यांनी एकदा तरी मुख आरोग्य तपासणी करावी, म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

- डॉ. फैसल सलीम खान, ओरल ॲण्ड मॅक्झिलोफेसिएल सर्जन, हिंगोली