शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटप होत नसल्याने खासदारांनी बाेलावली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:30 IST

आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये गतवर्षी ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त पीक कर्जवाटप झाले असताना हिंगोलीत मात्र ५० टक्के वाटप झाले. यंदा १०० टक्के ...

आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये गतवर्षी ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त पीक कर्जवाटप झाले असताना हिंगोलीत मात्र ५० टक्के वाटप झाले. यंदा १०० टक्के पीककर्ज वाटप न झाल्यास रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे तक्रार करण्याचा इशारा खा. पाटील यांनी दिला. पीक कर्ज वाटपात सध्या इतर जिल्ह्यांमध्ये बँकांनी आघाडी घेतली असताना हिंगोली जिल्ह्यात बँका कागदी घोडे नाचविण्यात दंग आहेत. या पार्श्वभूमीवर खा. पाटील यांनी मंगळवारी जिल्हा अधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली. तसेच सध्या किती पीक कर्ज वाटप झाले, याचा आढावा घेतला. एक दिवसआड बँकांमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुभा दिली आहे. मात्र, बँका शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले आहे. याबाबतच्या तक्रारी वाढल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर सेनगाव, गोरेगाव येथील बँकांबाबत गंभीर तक्रारी असल्याचे पाटील यांनी सांगितले. याठिकाणी दलालांमार्फत गेल्याशिवाय शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजूर होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत २९ मे रोजी बँकांची बैठकही आयोजित करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसे निवेदनही दिले. त्याचबरोबर सध्या एक दिवस दिलेला असल्याने त्यादिवशी दोन सत्रांमध्ये पीक कर्जाचे प्रस्ताव तयार करून घेण्यास अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सावंत यांना सांगितले. यावेळी महसूल व इतर यंत्रणांची मदत घेण्यासही सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उद्धव गायकवाड, शिवसेना समन्वयक दिलीप बांगर, डॉ. रमेश शिंदे आदींची उपस्थिती होती.