शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

उच्च पातळी बंधाऱ्यांना निधीसाठी खासदारांचे जलसंपदा मंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST

मंत्री जयंत पाटील नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खा. पाटील यांनी कयाधू नदीवरील खरबी येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे पाणी ...

मंत्री जयंत पाटील नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खा. पाटील यांनी कयाधू नदीवरील खरबी येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे पाणी लिफ्ट करून इसापूर धरणात टाकण्यात येऊ नये, तर ते पाणी हिंगोली जिल्ह्यातच वापरण्यात यावे, अशी आग्रही भूमिका घेतली .

हिंगोली जिल्ह्याची सिंचन क्षमता अत्यल्प आहे, अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्ह्यात उपसा सिंचन योजना मंजूर करणे गरजेचे आहे. उच्च पातळी बंधारे आणि प्रलंबित जलविद्युत प्रकल्प पूर्ण करून साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास आगामी काळात याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल याकरिता खा. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाची परिस्थिती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. हिंगोली जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा, येलदरी आणि सिद्धेश्वर हे मोठे प्रकल्प आहेत; परंतु याचा लाभ जिल्ह्यास मिळत नाही. त्यामुळेच या प्रकल्पावर उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात यावी, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पावरील उच्च पातळी बंधारे, कळमनुरी तालुक्यातील सापळी धरणाऐवजी नांदापूर, सालेगाव, डिग्रस, कोंढूर आणि कसबे धावंडा हे उच्च पातळीचे साखळी बंधारे मंजूर करण्यात यावेत, कौठा तांडा, ता. हिमायतनगर - सहस्त्रकुंड ता. किनवट येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बहुद्देशीय जलविद्युत प्रकल्प तत्काळ सुरू करण्यात यावा. पूर्णा प्रकल्पांतर्गत पूर्णा सिद्धेश्वर धरणाखाली पूर्णा नदीवर औंढा तालुक्यातील पोटा, वसमत तालुक्यातील जोड परळी, पिंपळगाव कुटे आणि परभणी जिल्ह्यातील ममदापुर येथे चार उच्च पातळी बंधारे बांधण्यात यावेत, तसेच हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस आणि सेनगाव तालुक्यातील सुकळी येथील साठवण तलावांना प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. यासह वसमत तालुक्यातील पिंपळखुटा व बोराळा येथील साठवण तलावाची कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत. हिंगोलीच्या लघु पाटबंधारे विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत यासह विविध मागण्यांचे निवेदन खा. पाटील यांनी दिले. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.