शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST

हिंगोली : कोविडमुक्त गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची मान्यता घेऊन शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत; परंतु महाविद्यालयांबाबतही सांगण्यात ...

हिंगोली : कोविडमुक्त गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची मान्यता घेऊन शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत; परंतु महाविद्यालयांबाबतही सांगण्यात आले नसल्याने याबाबत शासनाच्या सूचना आल्यास महाविद्यालये सुरू केली जातील, अशी प्रतिक्रिया प्राचार्यांनी दिली.

दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोरोना महामारीची शक्यता सर्वाधिक तर १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना कमी धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोविडमुक्त क्षेत्रांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सुरुवातीला म्हणजे पहिल्या टप्प्यात शाळांना पालकांसोबत ठराव करून निर्णय घ्यावा लागणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी घरूनच शैक्षणिक साहित्य आणावे लागेल. शैक्षणिक साहित्याची आदलाबदल होऊ द्यायची नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर सामाजिक अंतरही ठेवावे लागणार आहे. सामाजिक अंतर कसे ठेवणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर कर्मचारी वा विद्यार्थी संशयित आढळल्यास रुग्णालयात दाखल करून मदतही घ्यावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याच्या शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शासनाने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली तर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालयेही सुरू केले जातील, असेही शहरातील प्राचार्यांनी सांगितले.

शाळा सुरू झाल्यानंतर एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. दरम्यान, सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर व अँटिजन चाचणीही करून घ्यावी लागणार आहे.

प्राचार्यांची तयारी...

महाविद्यालये सुरू झाल्यास आम्ही सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेऊ; पण शासनाच्या तशा काही सूचना अजून तरी आलेल्या नाहीत. महाविद्यालये सुरू झाल्यावर सामाजिक अंतर, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालनही करण्यात येईल.

- अशोक लाठी, प्रभारी प्राचार्य

सध्यातरी शासनाचे महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्देश आलेले नाहीत. शासन ज्याप्रमाणे निर्देश देईल, त्यानंतर महाविद्यालये सुरू केली जातील. यादरम्यान कोरोनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालनही करण्यात येईल.

- प्राचार्य डॉ. बी. एस. क्षीरसागर

विद्यार्थिही प्रतीक्षेत.....

महाविद्यालये बंद असल्यामुळे अभ्यासावर परिणाम होत आहे. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी प्रत्येकाकडे अँड्राॅइड मोबाइल असेलच असे नाही. ग्रामीण भागात तर मोबाइलला रेंजही नसते. महाविद्यालये सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

-

कोरोना महामारीमुळे गत दीड वर्षापासून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. ऑफलाइन वर्ग सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, एवढे मात्र नक्की. महाविद्यालये सुरू व्हावीत, असे मनापासून वाटते.

जिल्ह्यातील एकूण महाविद्यालय-

एकूण विद्यार्थी संख्या

कला

वाणिज्य

विज्ञान

-