शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

कंट्रोल रूमकडे सर्वाधिक तक्रारी, बाजारपेठ कधी सुरू होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

हिंगोली: कोरोना महामारीमुळे शासनाने सर्वच जिल्ह्यात कंट्रोल रूम सुरू केले होते. या कंट्रोल रूममध्ये स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याने ...

हिंगोली: कोरोना महामारीमुळे शासनाने सर्वच जिल्ह्यात कंट्रोल रूम सुरू केले होते. या कंट्रोल रूममध्ये स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याने त्या तक्रारीचे निरसन केले पाहिजे, अशा सूचनाही दिल्या होत्या. मार्च ते मे या तीन महिन्यांत कंट्रोल रूमकडे जवळपास ३८ तक्रारी आल्या होत्या.

२३ मार्च २०१९ पासून कोरोनाने सर्वत्र कहर केला होता. त्यामुळे सर्वच ठिकाणची बाजारपेठ बंद होती. त्यामुळे मजूर, नोकरदारांना नोकऱ्याही गमवाव्या लागल्या होत्या. कोरोना महामारीमुळे अनेक जण त्राहीमाम झाले होते. या दरम्यान, नागरिक, रुग्ण, त्यांचे नातेवाईक व इतरांसाठी शासनाने जिल्ह्याच्या ठिकाणी कंट्रोल रूमची स्थापना केली होती. या दरम्यान, जास्त करून ‘बाजारपेठ कधी सुरू होणार’ याबाबतच्या तक्रारी आल्या होत्या. मार्च महिन्यात १६, एप्रिल महिन्यात १३ आणि मे महिन्यामध्ये ९ तक्रारी आल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक बाजारपेठेच्या संदर्भातील होत्या. आरोग्याच्या संदर्भात या दरम्यान शासनाने एक पथक नेमले होते. यात उपजिल्हाधिकारी व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश केला होता. त्यामुळे आरोग्याबाबत तक्रारी या पथकाकडे गेल्याचे कंट्रोलरूम येथून सांगण्यात आले.

तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी...

मार्च महिना १६

एप्रिल महिना १३

मे महिना ९

आरोग्यासाठी नेमले स्वतंत्र पथक...

कोरोना काळात जास्त करुन तक्रारी बाजारपेठ कधी सुरू होणार? बाजारपेठेची वेळ काय राहील? या संदर्भातील होत्या. आरोग्याच्या तक्रारीसाठी शासनाने स्वतंत्र पथकाची नेमणूक केली होती. त्यामुळे आरोग्यसंदर्भातील तक्रारी कंट्रोल रूमकडे आलेल्या नाहीत.

कंट्रोल रूमकडे आलेल्या तक्रारी...

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पैसे मिळणार का? कधी मिळणार?

बाजारपेठेची वेळ निश्चित झाली का? केव्हा उघडणार बाजारपेठ?

बाजारपेठ बंद आहे. व्यावसाय बुडीत निघत आहे. काही तरी उपाययोजना आहे का?

कोरोनाने मृत्यू झालेल्यांना अनुदान आहे काय? तसा काही आपल्याकडे अर्ज आहे का?

कोणत्या वेळात बाजारपेठ उघडणार आहे, याची माहिती आहे का?

तीन महिन्यांमध्ये कंट्रोल रूमकडे आलेल्या सर्व तक्रारींचे योग्य प्रकारे निरसन केले आहे. सर्वांना शासनाने कोरोना संदर्भात घालून दिलेले नियम सांगितले. तक्रारकर्त्यांना योग्य दिशाही दिली. तुमचा संदेश संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पाठविला जाईल, असेही सांगितले. तीन महिन्यात जवळपास ३८ तक्रारी आल्या. यात जास्त करून ‘बाजारपेठ कधी सुरू होणार’ या होत्या.

- रोहित कंजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी