शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वैधपेक्षा अवैध जोडण्याच आढळल्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:02 IST

मागील अनेक दिवसांपासून शेतकºयांचे रोहित्र जळण्याच्या तक्रारी होत्या. तर रोहित्र बदलून देण्यासाठी शेतकरीही आक्रमक झाले होते. विद्यूत वितरण कंपनीने रोहित्र पुरविल्याने काही प्रमाणात शेतकºयांचे वादळ शांत झाले आहे.

ठळक मुद्देकारवाई करण्याचा सपाटा : रोहित्र जळण्याचा घेतला जातोय शोध; पथक तयार

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील अनेक दिवसांपासून शेतकºयांचे रोहित्र जळण्याच्या तक्रारी होत्या. तर रोहित्र बदलून देण्यासाठी शेतकरीही आक्रमक झाले होते. विद्यूत वितरण कंपनीने रोहित्र पुरविल्याने काही प्रमाणात शेतकºयांचे वादळ शांत झाले आहे. तोच आता रोहित्र जळण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न कंपनीच्यावतीने घेतला जात असता, यामध्ये रोहित्रावर वैध पेक्षा अवैध जोडण्याच जास्त असल्याचे समोर येत आहे.जिल्ह्यामध्ये रोहित्रावरुन वादळ पेटले होते. एवढेच काय तर विविध पक्ष संघटनेच्यावतीने आंदोलने केल्यानंतर महावितरणने शक्य होईल तेव्हढ्या गावात रोहित्राची दुरुस्ती केली तर काही गावात नविन रोहित्र दिले. काही प्रमाणात रोहित्राचा प्रश्न सुटला असला तरीही रोहित्र जळण्याची कारणे शोधण्यासाठी महावितरण कंपनीने अधिक्षक अभियंत्यासह कर्मचाºयांचे पथक तयार करुन रोहित्रावरील भार तपासला जात आहे. यामध्ये एकट्या हिंगोली तालुक्यात केवळ दोनच रोहित्राची पाहणी केली असता, एकावर सात आणि दुसºया रोहित्रावर १ अवैध जोडणी आढळून आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील इतर रोहित्रावर अजून किती भार असेल याचा शोध पथकाकडून घेतला जात आहे. तर बºयाच भागातील शेतकरी एका - एका कोटेशनवर चार ते पाच विद्यूत मोटारी चालवित असल्याचेही महावितरणकंडून सांगण्यात आले. त्यामुळे रोहित्रावर भार येऊन रोहित्र जळण्याचे प्रकार सर्रास पणे घडत आहेत. मात्र या पथकामार्फत अवैध जोडणीचा शोध घेण्यात येत असून, अवैध जोडणी धारकांच्या विद्यूत मोटारी व वाईर जप्त केला जात करुन त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.