शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
4
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
5
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
6
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
7
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
8
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!
9
FD मध्ये गुंतवणूक करायचीय? हे आहेत 10 बेस्ट बँक ऑप्शन्स, येथे मिळतोय जवळपास 9% परतावा; जाणून घ्या सविस्तर
10
Diwali 2025: रांगोळीत दडलंय लक्ष्मी कृपेचं गूढ, एकदा समजून घ्याल तर स्टिकर वापरणार नाही!
11
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
12
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
13
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
14
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
15
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
16
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
17
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
18
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
19
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
20
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई

म्युकरमायकोसिसवरील किमान खर्च ८ लाख; शासनाची मदत केवळ दीड लाखांची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST

हिंगोली : म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आता वाढत चालले आहेत. जिल्ह्यात जवळपास १७ रुग्ण झाले असून, एकाचा मृत्यूही झाला ...

हिंगोली : म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आता वाढत चालले आहेत. जिल्ह्यात जवळपास १७ रुग्ण झाले असून, एकाचा मृत्यूही झाला आहे. या आजारासाठी महागडी औषधे लागत असून, त्यासाठी खर्च आठ लाखांचा अन् शासनाची मदत दीड लाखांचीच अशी गत झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत रुग्ण तेवढे गंभीर होत नव्हते. शिवाय जास्त दिवस ऑक्सिजनवर राहण्याची वेळ येत नव्हती. दुसऱ्या लाटेत जास्त संख्येने रुग्ण गंभीर होत होते. शिवाय या लाटेत अशा रुग्णांना कोविडमधून बरे झाल्यावर म्युकरमायकोसिसची लक्षणेही समोर आली. यात पहिल्या टप्प्यात उपचार घेतले तर तेवढा खर्च येत नाही. मात्र, आजार बळावला तर सलग चार ते पाच आठवडे रोज इंजेक्शन व इतर चाचण्या करण्यात हिंगोलीसारख्या ठिकाणी रुग्णालयात दाखल झाल्यास पाच ते सहा लाखांचा खर्च येतो. मात्र, मोठ्या शहरात दाखल झाल्यास आठ ते दहा लाखांचाही खर्च होऊ शकतो. त्यामुळे आता अनेक रुग्ण या खर्चामुळेही हैराण झाले आहेत. काहींना नांदेड, औरंगाबाद, पुणे येथे संदर्भित केले आहे. तेथेही यावरील औषधे मिळत नसून, मिळाली तरीही मोठा खर्च करावा लागत आहे.

म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण

१७

म्युकरमायकोसिसचे एकूण मृत्यू

रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव

हिंगोलीत केवळ शासकीय रुग्णालयातच म्युकरमायकोसिसवरील औषधे उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयांत याबाबतचे इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयातच उपचार करावे लागत आहेत. अनेक रुग्णांनी हिंगोलीत उपचार घेण्याऐवजी औरंगाबाद, नांदेड, पुणे गाठले आहे. अशा रुग्णांनाही तेथे उपचारासाठी औषधे मिळत नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ज्यांचा आजार बळावला आहे, त्यांना चार ते पाच लाखांपर्यंतचा खर्च आतापर्यंत करावा लागला आहे. एवढे करूनही रुग्ण हाती लागेल की नाही, याची चिंता सतावत आहे. शिवाय शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, पूर्ण उपचार एकतर शासकीय संस्थेत मिळावेत अथवा हा खर्च वाढवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

मोफत औषधे नावालाच

जिल्हा रुग्णालयात मोफत औषधे मिळत आहेत, हे खरे आहे. मात्र, रुग्णांना या आजाराची भीती बसल्याने नातेवाईक इतर ठिकाणी हलवत आहेत. मोठ्या रुग्णालयात दाखल केले तर तेथे औषधांची टंचाई आहे. बाजारपेठेतही यावरील औषधे मिळत नाहीत. त्यामुळे औषधे मोफत असल्याचे सांगणे हे नावालाच आहे.

हिंगोली जिल्हा रुग्णालयातही आता २५ इंजेक्शनच शिल्लक आहेत. रुग्णसंख्या जशी वाढेल, तेव्हा ती पुरणारही नाहीत. दहा हजार इंजेक्शन मागवली आहेत, मात्र अजून ती मिळालेली नाहीत.

केंद्र व राज्य शासन आता म्युकरमायकोसिसबाबत गंभीर झाले आहे. या आजारावरील औषधे व त्यासाठीचे स्वतंत्र वाॅर्ड सुरू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यासाठी वारंवार बैठकाही घेतल्या जात आहेत.