शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसवरील किमान खर्च ८ लाख; शासनाची मदत केवळ दीड लाखांची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST

हिंगोली : म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आता वाढत चालले आहेत. जिल्ह्यात जवळपास १७ रुग्ण झाले असून, एकाचा मृत्यूही झाला ...

हिंगोली : म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आता वाढत चालले आहेत. जिल्ह्यात जवळपास १७ रुग्ण झाले असून, एकाचा मृत्यूही झाला आहे. या आजारासाठी महागडी औषधे लागत असून, त्यासाठी खर्च आठ लाखांचा अन् शासनाची मदत दीड लाखांचीच अशी गत झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत रुग्ण तेवढे गंभीर होत नव्हते. शिवाय जास्त दिवस ऑक्सिजनवर राहण्याची वेळ येत नव्हती. दुसऱ्या लाटेत जास्त संख्येने रुग्ण गंभीर होत होते. शिवाय या लाटेत अशा रुग्णांना कोविडमधून बरे झाल्यावर म्युकरमायकोसिसची लक्षणेही समोर आली. यात पहिल्या टप्प्यात उपचार घेतले तर तेवढा खर्च येत नाही. मात्र, आजार बळावला तर सलग चार ते पाच आठवडे रोज इंजेक्शन व इतर चाचण्या करण्यात हिंगोलीसारख्या ठिकाणी रुग्णालयात दाखल झाल्यास पाच ते सहा लाखांचा खर्च येतो. मात्र, मोठ्या शहरात दाखल झाल्यास आठ ते दहा लाखांचाही खर्च होऊ शकतो. त्यामुळे आता अनेक रुग्ण या खर्चामुळेही हैराण झाले आहेत. काहींना नांदेड, औरंगाबाद, पुणे येथे संदर्भित केले आहे. तेथेही यावरील औषधे मिळत नसून, मिळाली तरीही मोठा खर्च करावा लागत आहे.

म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण

१७

म्युकरमायकोसिसचे एकूण मृत्यू

रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव

हिंगोलीत केवळ शासकीय रुग्णालयातच म्युकरमायकोसिसवरील औषधे उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयांत याबाबतचे इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयातच उपचार करावे लागत आहेत. अनेक रुग्णांनी हिंगोलीत उपचार घेण्याऐवजी औरंगाबाद, नांदेड, पुणे गाठले आहे. अशा रुग्णांनाही तेथे उपचारासाठी औषधे मिळत नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ज्यांचा आजार बळावला आहे, त्यांना चार ते पाच लाखांपर्यंतचा खर्च आतापर्यंत करावा लागला आहे. एवढे करूनही रुग्ण हाती लागेल की नाही, याची चिंता सतावत आहे. शिवाय शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, पूर्ण उपचार एकतर शासकीय संस्थेत मिळावेत अथवा हा खर्च वाढवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

मोफत औषधे नावालाच

जिल्हा रुग्णालयात मोफत औषधे मिळत आहेत, हे खरे आहे. मात्र, रुग्णांना या आजाराची भीती बसल्याने नातेवाईक इतर ठिकाणी हलवत आहेत. मोठ्या रुग्णालयात दाखल केले तर तेथे औषधांची टंचाई आहे. बाजारपेठेतही यावरील औषधे मिळत नाहीत. त्यामुळे औषधे मोफत असल्याचे सांगणे हे नावालाच आहे.

हिंगोली जिल्हा रुग्णालयातही आता २५ इंजेक्शनच शिल्लक आहेत. रुग्णसंख्या जशी वाढेल, तेव्हा ती पुरणारही नाहीत. दहा हजार इंजेक्शन मागवली आहेत, मात्र अजून ती मिळालेली नाहीत.

केंद्र व राज्य शासन आता म्युकरमायकोसिसबाबत गंभीर झाले आहे. या आजारावरील औषधे व त्यासाठीचे स्वतंत्र वाॅर्ड सुरू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यासाठी वारंवार बैठकाही घेतल्या जात आहेत.