शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

घरांना आग लागल्याने लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:49 IST

हिंगोली तालुक्यातील जयपूर वाडी गावातील दोन घरांना आग लागल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. गावात पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील जयपूर वाडी गावातील दोन घरांना आग लागल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. गावात पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.जयपूरवाडी येथील श्रीराम कºहाळे यांच्या लाकडी माळवदाच्या घराला आग लागली. घरातील देवाच्या देव्हाऱ्यातील दिव्याने लाकडाच्या खांबाला आग लागल्याचा अंदाज आहे. त्यानंतर आगीने उग्र रुप धारण केल्याने पाहता पाहता शेजारील नागोजी सूर्याजी गाढे यांच्याही घराला आग लागली. या आगीत श्रीराम कºहाळे यांचे माळवदाचे घर कोसळल्याने घरातील सर्व साहित्य माळवदाखाली दबले गेले. त्यात कºहाळे यांचे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले आहे. तर नागोजी सूर्याजी गाढे यांचे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आग विझविण्यासाठी सर्व गाव एकवटले होते. मात्र गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने पाणी उपलब्ध नव्हते. ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरुन पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी १ वाजता दाखल झाले. अग्निशमन दलाचे पथक येण्यापूर्वीच ग्रामस्थांनी आग विझवली होती. येथील परिसरात यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जयपूर वाडीमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावात पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही तर, आग विझवण्यासाठी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. याही परिस्थितीत आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.शॉटसर्किटमुळे आखाडा जळून खाक४शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील भवानीच्या माळाजवळील शेतात ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान शॉटसर्किटमुळे पेट घेऊन आखाड्यातील विविध शेतीपयोगी औजारे जळून खाक झाली आहेत. कुठलीही जीवित हानी झाली नाही. शिरडशहापूर येथील गट. क्र. ५३५ मधील चंद्रहार लक्ष्मण वाहटळे यांच्या शेतातील आखाड्याजवळील विजेच्या तारांचे घर्षण होऊन धुऱ्यावरील गवताने पेट घेतला. पाहता पाहता सर्वत्र आग लागली. यात आखाड्याने पेट घेतला. आखाड्यातील विविध शेती औजारे, ठिबक संच, पाईप इ. साहित्य जळून खाक झाले असून जवळपास एक लाख रुपयांच्या वर नुकसान झाले आहे.