शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST

हिंगोली : माणूस हा समाजशील प्राणी आहे. संवादातून सुख, दु:ख, प्रेम, जबाबदारी याची देवाण घेवाण होते. ज्या वेळेस संवाद ...

हिंगोली : माणूस हा समाजशील प्राणी आहे. संवादातून सुख, दु:ख, प्रेम, जबाबदारी याची देवाण घेवाण होते. ज्या वेळेस संवाद साधणे थांबते, त्यावेळी भावनिक देवाण घेवाणही थांबते. भावनिक संवाद थाबतो, त्यावेळेस मानसिक आजारांना निमंत्रण मिळते. सध्या कोरोनामुळे प्रत्येकांचा संवाद कमी झाला असून यातून कलह निर्माण होत आहेत. पर्यायाने मानसिक स्वास्थ हरवत चालल्याचे दिसून येत आहे.

कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. तसेच विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून कौटुंबिक कलहही निर्माण होत असून यातून मानसिक स्वास्थ बिघडत चालले आहे. घरात पती-पत्नी, आई-वडिलांशी वाद होणे, घरातील छोट्या छोट्या गाेष्टी समजून न घेणे, झोप न लागणे, सतत चिडचिड वाटणे, कामात मन न लागणे, कामावर लक्ष न राहणे, विसराळूपणा येणे, शरीरावर, चेहऱ्यावर काळे डाग होणे तसेच वरिष्ठांचे फोन घेताना किंवा बैठकीस उपस्थित राहताना घबराहट होण्यासारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मानसिक स्वास्थ टिकविण्यासाठी संवाद साधणे महत्त्वाचे ठरत आहे.

मन हलके करणे हाच उपाय

-घरी असताना मोबाइल बाजूला ठेवून पत्नी, आई-वडील, मुले यांच्याशी संवाद साधावा. त्यांच्यासमोर आपले मन मोकळे करा.

-घरी, कार्यालयात असताना समोरील व्यक्तींनाही महत्त्व देणे. त्यांच्या सोबत आपला संवाद साधणे.

- केवळ मोबाइलवरून न बोलता समोरासमोर बोलण्याचा प्रयत्न करावा.

माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे घर, कार्यालय, कॉलनी, गाव, समाजात वावरताना संवाद साधणे महत्त्वाचे आहे. ज्या वेळेस संवाद साधणे थांबतो, त्यावेळेस भावनिक देवाण घेवाणही थांबते. भावनिक संवाद थाबतो, त्यावेळेस मानसिक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे संकट कितीही मोठे असले तरी संवाद साधल्यास मन हलके होऊन त्यातून मार्ग सापडतो. संवाद साधणे महत्त्वाचे आहे.

-डॉ. दीपक डोणेकर, मानसोपचार तज्ज्ञ, हिंगोली