शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
4
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
5
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
6
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
7
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
8
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
9
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
10
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
11
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
12
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
14
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
15
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
16
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
18
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
19
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
20
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST

हिंगोली : माणूस हा समाजशील प्राणी आहे. संवादातून सुख, दु:ख, प्रेम, जबाबदारी याची देवाण घेवाण होते. ज्या वेळेस संवाद ...

हिंगोली : माणूस हा समाजशील प्राणी आहे. संवादातून सुख, दु:ख, प्रेम, जबाबदारी याची देवाण घेवाण होते. ज्या वेळेस संवाद साधणे थांबते, त्यावेळी भावनिक देवाण घेवाणही थांबते. भावनिक संवाद थाबतो, त्यावेळेस मानसिक आजारांना निमंत्रण मिळते. सध्या कोरोनामुळे प्रत्येकांचा संवाद कमी झाला असून यातून कलह निर्माण होत आहेत. पर्यायाने मानसिक स्वास्थ हरवत चालल्याचे दिसून येत आहे.

कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. तसेच विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून कौटुंबिक कलहही निर्माण होत असून यातून मानसिक स्वास्थ बिघडत चालले आहे. घरात पती-पत्नी, आई-वडिलांशी वाद होणे, घरातील छोट्या छोट्या गाेष्टी समजून न घेणे, झोप न लागणे, सतत चिडचिड वाटणे, कामात मन न लागणे, कामावर लक्ष न राहणे, विसराळूपणा येणे, शरीरावर, चेहऱ्यावर काळे डाग होणे तसेच वरिष्ठांचे फोन घेताना किंवा बैठकीस उपस्थित राहताना घबराहट होण्यासारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मानसिक स्वास्थ टिकविण्यासाठी संवाद साधणे महत्त्वाचे ठरत आहे.

मन हलके करणे हाच उपाय

-घरी असताना मोबाइल बाजूला ठेवून पत्नी, आई-वडील, मुले यांच्याशी संवाद साधावा. त्यांच्यासमोर आपले मन मोकळे करा.

-घरी, कार्यालयात असताना समोरील व्यक्तींनाही महत्त्व देणे. त्यांच्या सोबत आपला संवाद साधणे.

- केवळ मोबाइलवरून न बोलता समोरासमोर बोलण्याचा प्रयत्न करावा.

माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे घर, कार्यालय, कॉलनी, गाव, समाजात वावरताना संवाद साधणे महत्त्वाचे आहे. ज्या वेळेस संवाद साधणे थांबतो, त्यावेळेस भावनिक देवाण घेवाणही थांबते. भावनिक संवाद थाबतो, त्यावेळेस मानसिक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे संकट कितीही मोठे असले तरी संवाद साधल्यास मन हलके होऊन त्यातून मार्ग सापडतो. संवाद साधणे महत्त्वाचे आहे.

-डॉ. दीपक डोणेकर, मानसोपचार तज्ज्ञ, हिंगोली