शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

गुळगुळीत उत्तरांमुळे सदस्यांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेचा ‘पहिले पाढे पंचावन्न’ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गुळगुळीत उत्तरे देऊन वेळ मारून नेणाऱ्या ...

हिंगोली : जिल्हा परिषदेचा ‘पहिले पाढे पंचावन्न’ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गुळगुळीत उत्तरे देऊन वेळ मारून नेणाऱ्या अधिकाऱ्यांना जि.प. सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. उपहासात्मक बोलून, कोपरखळ्या मारत या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली. तरीही सुधारणा दिसत नसल्याने सभात्याग केल्याने अध्यक्ष गणाजी बेले यांनी सभा तहकूब केल्याची घोषणा केली.

जि.प. अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखालील या सभेस सीईओ आर.बी. शर्मा, उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती फकिरा मुंडे, रत्नमाला चव्हाण, रूपाली पाटील, बाजीराव जुंबडे यांची उपस्थिती होती. यावेळी सीएमजेएसवायमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या अभियंत्यांचा मुद्दा पुन्हा गाजला. त्यांचे वेतन न देण्याचा ठराव घेतल्यानंतरही ते का अदा केले, असा सवाल सदस्यांनी केला. त्यावर अतिरिक्त मुकाअ शेंगूलवार यांनी गोलमाल उत्तर देण्याचा केलेला प्रयत्न सदस्यांनी हाणून पाडला. जि.प. सदस्य अंकुश आहेर, अजित मगर, संजय कावरखे हे आक्रमक दिसत होते. जि.प.मध्येच अभियंत्यांची कमतरता असताना या लोकांना तिकडे दिले. मग वेतन तरी का द्यायचे, जि.प.चेच अभियंते नेमणे अनिवार्य आहे का? आदी सवाल केले. मात्र, यात शासन निर्णय व इतर बाबी मिळत नसल्याने शेवटी प्रभारी कार्यकारी अभियंता तांबे यांना दिलगिरी व्यक्त करायला लावली. जि.प. सदस्या वैष्णवी घुगे यांनी प्रशासकीय व विनंती बदल्या मागच्या वेळी का झाल्या नाही, यापुढे होणार की कसे? अशी विचारणा केली. त्यावर मे महिन्यात बदल्या होणार असल्याचे सांगण्यात आले.

लम्पी आजाराबाबत शिबिरे घेऊन गुरांचे लसीकरण करण्यासह या कार्यक्रमांना जि.प. सदस्यांना बोलावण्याचा ठराव झाला होता. तरीही सदस्यांना बोलावले नाही, असा आरोप आहेर यांनी केला. त्यावर आचारसंहितेची अडचण होती. मात्र, यापुढे सर्व कार्यक्रमांना बोलावण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यावर आता पुन्हा लम्पी आजार येणार की काय? अशी गुगली आहेर यांनी टाकली. त्यानंतर ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दाही मागील दोन वर्षांपासून चर्चेत आहे. जि.प.सदस्य अंकुश आहेर यांनी हा मुद्दा मांडला होता. किती ग्रामसेवक मुख्यालयी राहतात, याची माहिती बीडीओंनी सादरच केली नव्हती. हिंगोली बीडीओ पोहरे यांनी ६५ पैकी ३ जण मुख्यालयी राहतात, असे सांगितले, तर वसमत तालुक्यात ८० पैकी २ जण मुख्यालयी राहतात. मात्र, कळमनुरी, औंढा व सेनगावच्या बीडीओंनी विस्तार अधिकाऱ्यांनी माहिती दिली नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याने सदस्य खवळले. ग्रामसेवकाची तक्रार करणे हा हेतू नाही, मात्र, प्रशासन गंभीर नाही, हास्यास्पद कारभार सुरू असल्याची टीका अनिल पतंगे यांनी केली, तर जनतेचे विषय मांडायचे की टाइमपास करायचा, असा सवाल डॉ. सतीश पाचपुते यांनी केला. अजित मगर, संजय कावरखे, विठ्ठल चौतमल यांनीही यावरून धारेवर धरले.

सुरुवातीला जि.प. सदस्य बाळासाहेब मगर यांनी आरोग्य, महिला व बालविकास, सामान्य प्रशासन आदी चार विभागांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. यावर आरोग्य विभागाबाबतच्या ठरावाला अजित मगर यांनी आक्षेप घेतला. धूरफवारणी यंत्रांसाठी ११.२३ लाखांचा निधी ५ जूनला मिळाला होता. २५ धूर फवारणी यंत्र मिळाले. मात्र, ते हिवताप कार्यालयात पडून आहेत. यावरून अजित मगर यांनी सवाल केला.