शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
6
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
7
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
8
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
9
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
10
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
11
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
12
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
13
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
14
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
15
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
16
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
17
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
18
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

कमाल तापमानात १ ते २ कमाल तापमानात १ ते २ अंशाने वाढ होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

हिंगोली: येत्या पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात १.० ते २.० अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज ‘वनामकृ’विद्यापीठाच्या ...

हिंगोली: येत्या पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात १.० ते २.० अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज ‘वनामकृ’विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने वर्तविला आहे.

उन्हाची तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पिकांच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी. यामुळे कलमांची हानी होणार नाही, तसेच बागेत खोडाजवळ चांगल्या प्रकारे आच्छादन करावे. केळी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी. आंबा बागेत ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याची व्यवस्था करावी. मुख्य खोडाजवळ भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील आळ्या काढून नष्ट करणे गरजेचे आहे.

भाजीपाला पिकांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. मिरची, वांगी, भेंडी पिकांमध्ये रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, पायरीप्रॉक्सिफेन ५ टक्के, फेनप्रोपाथ्रीन १५ टक्के दहा मिली किंवा डायमेथोएट ३० टक्के १३ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, जेणेकरून सर्व पिकांची चांगल्या पद्धतीने वाढ होईल.

शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी

येत्या २१ ते २७ एप्रिलदरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांसोबत इतर उन्हाळी पिकांची काळजी घ्यावी. गरज पडल्यास ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य प्रकल्प समन्वयक डाॅ.कैलास डाखोरे यांनी केले आहे.