शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कमाल तापमानात १ ते २ कमाल तापमानात १ ते २ अंशाने वाढ होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

हिंगोली: येत्या पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात १.० ते २.० अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज ‘वनामकृ’विद्यापीठाच्या ...

हिंगोली: येत्या पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात १.० ते २.० अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज ‘वनामकृ’विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने वर्तविला आहे.

उन्हाची तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पिकांच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी. यामुळे कलमांची हानी होणार नाही, तसेच बागेत खोडाजवळ चांगल्या प्रकारे आच्छादन करावे. केळी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी. आंबा बागेत ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याची व्यवस्था करावी. मुख्य खोडाजवळ भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील आळ्या काढून नष्ट करणे गरजेचे आहे.

भाजीपाला पिकांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. मिरची, वांगी, भेंडी पिकांमध्ये रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, पायरीप्रॉक्सिफेन ५ टक्के, फेनप्रोपाथ्रीन १५ टक्के दहा मिली किंवा डायमेथोएट ३० टक्के १३ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, जेणेकरून सर्व पिकांची चांगल्या पद्धतीने वाढ होईल.

शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी

येत्या २१ ते २७ एप्रिलदरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांसोबत इतर उन्हाळी पिकांची काळजी घ्यावी. गरज पडल्यास ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य प्रकल्प समन्वयक डाॅ.कैलास डाखोरे यांनी केले आहे.