शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ प्रचंड मोर्चा

By admin | Updated: November 11, 2014 15:33 IST

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी निघालेल्या मोर्चामध्ये शहराच्या विविध भागांतील आंबेडकरी जनता मोठय़ा संख्येने सहभागी झाली होती

शांतता व सनदशीर मार्गाने मांडली प्रखर निषेधाची भूमिकाजवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी निघालेल्या मोर्चामध्ये शहराच्या विविध भागांतील आंबेडकरी जनता मोठय़ा संख्येने सहभागी झाली होती. सकाळी ११ वाजल्यापासूनच विविध भागातील समुदायाने लोक एकत्रित येत होते. प्रचंड मोठी संख्या व मोर्चातील प्रखर निषेधाची भूमिका लक्षवेधी होती. परंतु तितक्याच शांतता व सनदशीर मार्गाने हा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. नांदेड : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे झालेल्या दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ नांदेडमध्ये सोमवारी काढण्यात आलेला महामोर्चा शांततेत पार पडला. हजारोंच्या संख्येने या मोर्चात तरूण व महिला सहभागी झाल्या होत्या. जवखेडा येथील जाधव कुटुंबियांच्या मारेकर्‍यांना त्वरित अटक करावी, या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी आदी मागण्यांसाठी तरोडा, देगावचाळ, हडको, इतवारा आदी भागातून मोर्चा काढण्यात आला होता. दुपारी १२ च्या सुमाराच्या या मोर्चांना प्रारंभ झाला. वजिराबाद चौकात विविध भागातून निघालेल्या या मोर्चाचे एकत्रिकरण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी चौक, शासकीय रूग्णालय मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. महात्मा फुले पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. निळ्या ध्वजासह पंचरंगी ध्वज हातात घेवून तरूण वर्ग महिलांनी शासनाच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी केली.जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आल्यानंतर या मोर्चाला भदंत पय्याबोधी, भदंत संघपाल, भदंत आनंदबोधी यांनी मार्गदर्शन केले. बुद्धांच्या शांततेच्या मार्गाने निषेध करणे हे आंबेडकरी अनुयायांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चाला कुठेही गालबोट लावू नका असे सांगताना त्यांनी आक्रमक तरूण वर्गाला शांत केले. या मोर्चात भदंत पय्याबोधी, भदंत संघपाल, भदंत शीलरत्न, भदंत जीनरत्न, भदंत संघप्रिय, भदंत आनंदबोधी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. कोणत्याही पक्ष अथवा संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नसल्यामुळे तरूण वर्गाने मोठय़ा संख्येने हजेरी लावली होती. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना निवेदन दिल्यानंतर त्याबाबतची माहिती मोर्चेकर्‍यांना रमेश सोनाळे, सुभाष रायबोले यांनी दिली. या मोर्चात आ. अमरनाथ राजूरकर, बापूराव गजभारे, प्रफुल्ल सावंत, रमेश सोनाळे, श्याम निलंगेकर, गौतम गजभारे, रमेश गोडबोले, डॉ. करूणा जमदाडे, रमेश सरोदे, नरेंद्र गायकवाड, संघरत्न खंदारे, सुखदेव चिखलीकर, बाळू राऊत, प्रकाश कामळजकर, मनीष कावळे, राज सोनसळे, साहेबराव गायकवाड, मोहन गर्दनमारे, दुष्यंत सोनाळे, रवी कसबे, अजय शेळके, राजू लांडगे, संघरत्न कांबळे, गणेश तादलापूरकर, प्रकाश वागरे, दिगांबर ढोले, बाळासाहेब देशमुख, गौतम पवार, प्रीतम जोंधळे, अनिल बिर्‍हाडे, संदीप सोनकांबळे, डी. पी. गायकवाड, मंगेश कदम, उपेंद्र तायडे, श्याम कांबळे, जयपाल ढवळे, विजयानंद पोवळे, देवानंद सरोदे, प्रशांत इंगोले, शिल्पा नरवाडे, अनिता हिंगोले, महादेवी मठपती, अपर्णा साळवे, लक्ष्मी वाघमारे, सुषमा थोरात आदींची उपस्थिती होती. अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्यासह सहायक पोलिस अधीक्षक देशमुख यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा जिल्हा कचेरीसमोर हजर होता. /(प्रतिनिधी)