शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

CAA : हिंगोलीत नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 13:57 IST

राष्ट्रप्रेमी नागरीक कृती समितीच्या वतीने नागरीकत्व संशोधन कायद्याचे समर्थनासाठी मोर्चा

हिंगोली : शहरातील गांधी चौकातून २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शांततेत भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने महिला, पुरूष, युवक सहभागी झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर केलेल्या नागरीकता संशोधन कायदा २०१९ नुसार बांगलादेश, आफगाणीस्तान आणि पाकीस्तान या तीन शेजारील देशात राहणाऱ्या हिंदू, ख्रिश्चन, पारशी, जैन, बौद्ध या नागरीकांना तेथे केवळ धर्माच्या आधारावर अत्याचारामुळे प्रताडीत होऊन भारताच्या आश्रयाला आल्यानंतर भारताचे नागरीकत्व स्वीकारता येईल. भारतीय नागरीकत्व स्वीकारण्यासंदर्भात १९५५ मध्ये जो कायदा करण्यात आला होता त्यात दुरूस्ती करण्यात आली आहे. कायद्यानुसार भारतीय नागरीक होण्यासाठी भारतात ११ वर्ष आधिवास आवश्यक होता. या नागरिकत्व संशोधन कायद्यानुसार ११ वर्षाची अट ६ वर्षापर्यंत कमी करण्यात आली आहे. पाकिस्तान, बांगला देशा आणि अफगाणीस्तान या तीन देशातील मुस्लिमेत्तर नागरिकांनी भारतात ५ वर्ष वास्तव्य केले असेल तर त्यांना भारतीय नागरीकत्वासाठी पात्र समजल्या जाणार आहे. तसेच या कायद्यामुळे या देशात एकही घुसखोर शिल्लक राहणार नसल्याची हमी केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली आहे.

हिंगोली येथील राष्ट्रप्रेमी नागरीक कृती समितीच्या वतीने नागरीकत्व संशोधन कायद्याचे समर्थन करीत मोर्चा काढला. तसेच या कायद्याच्या विरोधात देशविरोधी कारवायांच्या माध्यमातून देशात तणाव निर्माण केला जात आहे. या तणाव निर्माण करणाऱ्यांचा कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला. 

मोर्चाला परवानगी नव्हतीहिंगोली शहरातील राष्ट्रप्रेमी नागरीक कृती समितीच्या वतीने मोर्चाला परवानगी द्यावी याबाबत हिंगोली शहर ठाण्यात अर्ज केला होता.मात्र पोलीस प्रशासनातर्फे या मोर्चाला परवानगी मिळाली नाही. तरीही कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनला होता.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकHingoliहिंगोलीMorchaमोर्चा