शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

गाव तिथे बाजार कागदावर

By admin | Updated: February 12, 2015 13:54 IST

शेतकरी/ पिकवायला शिकला तरी विकायला शिकला नाही. त्यासाठी आत्माने 'शेतकरी ग्राहक थेट कृषी माल विक्री योजनेतंर्गत 'गाव तिथं बाजारा' ची घोषणा केली.

हिंगोली : /शेतकरी/ पिकवायला शिकला तरी विकायला शिकला नाही. त्यासाठी आत्माने 'शेतकरी ग्राहक थेट कृषी माल विक्री योजनेतंर्गत 'गाव तिथं बाजारा' ची घोषणा केली. दोन वर्षानंतरही अधिकार्‍यांकडून कोणतेही प्रयत्न झाले नसल्याने ही घोषणा कागदावरच राहिली. परिणामी, ग्राहक आणि शतकर्‍यांची ताटातुटीमुळे कमी माल आणि बाजार लांब त्यातच दलाल आणि हमाल, या साखळी पोशिंद्याच्या हाती काहीच पडू देत नाही. महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग प्रकल्प संचालक (आत्मा) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविली जात आहे. यासाठी इच्छुकांनी शेतकरी गटांची स्थापना करून नोंद करणे आत्माकडून अपेक्षित होते. तद्नंतर गटांच्या उत्पादनानुसार तेथेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार होती; परंतु आत्माकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. जिल्ह्यातील प्रमुख शहरे, नगर परिषदा आणि ग्रामपंचयातीच्या ठिकाणी देखील बाजाराची उभारणी करण्यात आत्मा अपयशी ठरला. मुळात निधीचीही अडचण नव्हती. कृषी आणि आत्माकडून निधीची तरदूत होणार होती; परंतु अधिकारी व कर्मचारी शेतकरी गट, शेतकरी मंडळांपर्यंत पोहोचले नाहीत. दुसरीकडे शासनाने जाहीर केलेले हमीभाव समाधानकारक नाहीत. यापेक्षा अधिक दर बाजारात मिळतो. तो उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असतो. त्यातच शेतकर्‍यांच्या हाती माल येताच बाजारभाव घसरतो. हे चित्र प्रतिवर्षी कायम असून हंगामानंतर बाजारभाव वधारतो. हिंगोली बाजारात कापसाच्या रूपाने ही स्थिती पाहवास मिळत आहे. सर्वच प्रकारे शेतकरी भरडला जात आहे. दोन वर्षानंतरही प्रयत्न होत नसल्याने शेतकर्‍यांना कोणी वाली राहिले नसल्याची प्रतिक्रिया उत्पादकांकडून ऐकण्यास मिळत आहे. 

 ■ प्रामुख्याने अल्पभूधारक आणि भाजीवर्गीय पिके घेणार्‍या उत्पादकांना फटका सोसावा लागतो. त्यांची 'इकॉनॉमी' भाजीपाल्यावर अवलंबून असते. ४/पारंपरिक बाजारपेठेत शेतकर्‍यांना रास्त भाव मिळत नाही. दुसरीकडे हाच माल ग्राहकांना दुपटीने विकत घ्यावा लागतो. दोन्ही दरातील फरक दलालांमुळे निर्माण झाला. त्यासाठी आत्माकडून राज्यात थेट कृषी माल विक्री योजना राबविण्यात येत आहे.

■ कारण बाजारात नियमित माल पुरविणे तसेच ग्राहक जोडून त्याला कायम स्वरूपी टिकविणे हे या योजनेचे फलित आहे. जर असे झाले तर शेतकर्‍यांचाच जास्त फायदा असून उत्पादन ठिकाणीच मालाची विक्री होणार आहे.