शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
4
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
5
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
8
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
9
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
10
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
11
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
12
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
13
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
14
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
15
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
16
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
17
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
18
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
19
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
20
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   

गाव तिथे बाजार कागदावर

By admin | Updated: February 12, 2015 13:54 IST

शेतकरी/ पिकवायला शिकला तरी विकायला शिकला नाही. त्यासाठी आत्माने 'शेतकरी ग्राहक थेट कृषी माल विक्री योजनेतंर्गत 'गाव तिथं बाजारा' ची घोषणा केली.

हिंगोली : /शेतकरी/ पिकवायला शिकला तरी विकायला शिकला नाही. त्यासाठी आत्माने 'शेतकरी ग्राहक थेट कृषी माल विक्री योजनेतंर्गत 'गाव तिथं बाजारा' ची घोषणा केली. दोन वर्षानंतरही अधिकार्‍यांकडून कोणतेही प्रयत्न झाले नसल्याने ही घोषणा कागदावरच राहिली. परिणामी, ग्राहक आणि शतकर्‍यांची ताटातुटीमुळे कमी माल आणि बाजार लांब त्यातच दलाल आणि हमाल, या साखळी पोशिंद्याच्या हाती काहीच पडू देत नाही. महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग प्रकल्प संचालक (आत्मा) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविली जात आहे. यासाठी इच्छुकांनी शेतकरी गटांची स्थापना करून नोंद करणे आत्माकडून अपेक्षित होते. तद्नंतर गटांच्या उत्पादनानुसार तेथेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार होती; परंतु आत्माकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. जिल्ह्यातील प्रमुख शहरे, नगर परिषदा आणि ग्रामपंचयातीच्या ठिकाणी देखील बाजाराची उभारणी करण्यात आत्मा अपयशी ठरला. मुळात निधीचीही अडचण नव्हती. कृषी आणि आत्माकडून निधीची तरदूत होणार होती; परंतु अधिकारी व कर्मचारी शेतकरी गट, शेतकरी मंडळांपर्यंत पोहोचले नाहीत. दुसरीकडे शासनाने जाहीर केलेले हमीभाव समाधानकारक नाहीत. यापेक्षा अधिक दर बाजारात मिळतो. तो उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असतो. त्यातच शेतकर्‍यांच्या हाती माल येताच बाजारभाव घसरतो. हे चित्र प्रतिवर्षी कायम असून हंगामानंतर बाजारभाव वधारतो. हिंगोली बाजारात कापसाच्या रूपाने ही स्थिती पाहवास मिळत आहे. सर्वच प्रकारे शेतकरी भरडला जात आहे. दोन वर्षानंतरही प्रयत्न होत नसल्याने शेतकर्‍यांना कोणी वाली राहिले नसल्याची प्रतिक्रिया उत्पादकांकडून ऐकण्यास मिळत आहे. 

 ■ प्रामुख्याने अल्पभूधारक आणि भाजीवर्गीय पिके घेणार्‍या उत्पादकांना फटका सोसावा लागतो. त्यांची 'इकॉनॉमी' भाजीपाल्यावर अवलंबून असते. ४/पारंपरिक बाजारपेठेत शेतकर्‍यांना रास्त भाव मिळत नाही. दुसरीकडे हाच माल ग्राहकांना दुपटीने विकत घ्यावा लागतो. दोन्ही दरातील फरक दलालांमुळे निर्माण झाला. त्यासाठी आत्माकडून राज्यात थेट कृषी माल विक्री योजना राबविण्यात येत आहे.

■ कारण बाजारात नियमित माल पुरविणे तसेच ग्राहक जोडून त्याला कायम स्वरूपी टिकविणे हे या योजनेचे फलित आहे. जर असे झाले तर शेतकर्‍यांचाच जास्त फायदा असून उत्पादन ठिकाणीच मालाची विक्री होणार आहे.