शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सारंग स्वामी यात्रेत १०० क्विंटलच्या भाजीचा महाप्रसाद; प्रसादासाठी भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 18:55 IST

सारंगस्वामी यात्रेत या प्रसादाचे महत्त्व सर्वदूर पोचले असल्याने भाजीचा प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक-भक्त येथे सहभागी झाले होते.

ठळक मुद्देया वर्षी १०० क्विंटल भाजीचा प्रसाद करण्यात आला होता.शिरडशहापूर येथे विरशैव बांधवांचे आराध्यदैवत म्हणून सारंग स्वामी महाराजांना ओळखले जाते.

शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे सुरू असलेल्या सारंग स्वामी महाराज यांच्या यात्रेत शुक्रवार १७ जानेवारी रोजी १०० क्विंटल भाजीच्या प्रसादासाठी हजारोंच्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सारंगस्वामी यात्रेत या प्रसादाचे महत्त्व सर्वदूर पोचले असल्याने भाजीचा प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक-भक्त येथे सहभागी झाले होते. या वर्षी १०० क्विंटल भाजीचा प्रसाद करण्यात आला होता.

शिरडशहापूर येथे विरशैव बांधवांचे आराध्यदैवत म्हणून सारंग स्वामी महाराजांना ओळखले जाते. येथे अनेक वषार्पासून दरवर्षी मकर संक्रांतीपासून यात्रा महोत्सव सुरू होते. या यात्रेत भाजीच्या प्रसादाचे विशेष महत्त्व आहे. यात्रेत आलेल्या भाविकांनी सोबत पोळ्या घेऊन आले होते. या ठिकाणी तयार केलेल्या भाजीचा प्रसाद घेऊन भोजन केले .तसेच अनेक भाविक भाजीचा प्रसाद घरी घेऊन गेले. येथे परिसरातील भाविक गाडी बैलाने डोक्यावर शेतातील भाजीपाला घेऊन आले होते. यात टोमॅटो ,वांगी ,चवळी, दोडके, पालक, शेपू, मेथी ,करडी, पानकोबी ,फुलकोबी, हिरवी मिरची, सिमला मिरची ,गांजर ,काकडी, मुळा, कांदे, ऊस आदी प्रकारच्या १०० क्विंटल भाज्याचा यात समावेश होता. त्या सर्व भाज्या कढईत मिसळून त्यात गोडतेल, मसाला टाकून फोडणी दिल्यानंतर भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला. या भाजी प्रसादाचे भाविकांना नंतर वाटप करण्यात आले. यात्रेसाठी चारचाकी दुचाकी, तीन चाकी वाहने तसेच पायदळ देखील भाविक मोठ्या संख्येने आले होते. यात्रेसाठी परिवहन महामंडळाने बसची व्यवस्था केली होती.

या यात्रेत विविध वस्तू विक्रीच्या दुकानासह धार्मिक पुस्तके, धार्मिक साहित्य विक्रीचे दुकाने उभारण्यात आले होते. वीरशैव समाज बांधव शिरडशहापुर, सारंगवाडी, गवळेवाडी आदी गावातील ग्रामस्थांनी भाजीच्या प्रसादासाठी पुढाकार घेतला होता. भाजीप्रसाद यात्रेसाठी परभणी, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद , जालना जिल्ह्यासह आंध्रप्रदेश कर्नाटक व मराठवाड्यातील भाविक भाजीच्या प्रसादासाठी हजारोच्या संख्येने दाखल झाले. यात्रेमध्ये कोणतीही  अनुचित घटना  घडू नये या दृष्टिने पोलीस प्रशासनातर्फे व महसूल प्रशासनाच्यावतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेत प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, तहसीलदार सचिन जोशी, तलाठी मंडळाअधिकारी, कोतवाल आदी  उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीAdhyatmikआध्यात्मिक