शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मग्रारोहयोत पहिले पाढे पंचावन्नच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:28 IST

जिल्हा प्रशासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही खालील प्रशासन मग्रारोहयोच्या कामात अपेक्षित प्रगती दाखवत नसल्याने आता यात काहींच्या विभागीय चौकशीचे आदेश निघण्याचे संकेत मिळत आहेत. काही बाबींमध्ये मात्र सुधारणा झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा प्रशासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही खालील प्रशासन मग्रारोहयोच्या कामात अपेक्षित प्रगती दाखवत नसल्याने आता यात काहींच्या विभागीय चौकशीचे आदेश निघण्याचे संकेत मिळत आहेत. काही बाबींमध्ये मात्र सुधारणा झाल्या आहेत.जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी जुन्या कामांचा आढावा घेतला असता फारसी सुधारणा झाल्याचे चित्र दिसत नव्हते. निदान २0१४ पर्यंतची रखडलेली कामे तरी पूर्ण करण्याचे नियोजन करा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले. त्यामुळे एका ठरावीक काळापर्यंतची रखडलेली कामे तरी पूर्ण होतील. दोन दिवसांत नियोजन सादर करण्यास सांगितले. सिंचन विहिरींची कामेही पुन्हा आहे त्याच परिस्थितीत दिसत आहेत. यात एकूण २९८७ कामे सुरू असून पूर्ण झालेली कामे ५६४ आहेत. त्यामुळे वसमतमध्ये तर मागच्या बैठकीत दिलेल्या सूचनांचेही पालन झाले नसल्याने गटविकास अधिकाºयांना धारेवर धरले. जिओ टॅगिंग, जॉब कार्ड व्हेरिफिकेशनमध्ये प्रत्येकी ४ टक्क्यांनी वाढ झाली. तर वेळेत मजुरी अदा करण्याची परिस्थितीही सुधारली आहे. तेवढीच समाधानाची बाब आहे.जिल्ह्यातील ३0 गावांमध्ये आतापर्यंत एकही मग्रारोहयोचे काम झाले नाही. अशा ग्रामपंचायतींत कामे सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले. यात औंढा तालुक्यातील ३, वसमत-९, हिंगोली-७, कळमनुरी-४, सेनगाव-७ अशी स्थिती आहे. पालकमंत्री पाणंद रस्त्याची १४ कामे सुरू झाल्याचे सांगण्यात आले. यात वसमत-३, हिंगोली-१, सेनगाव-३, औंढा-१ व कळमनुरीत ६ कामे सुरू झाली आहेत.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीgovernment schemeसरकारी योजना