शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोत पहिले पाढे पंचावन्नच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:28 IST

जिल्हा प्रशासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही खालील प्रशासन मग्रारोहयोच्या कामात अपेक्षित प्रगती दाखवत नसल्याने आता यात काहींच्या विभागीय चौकशीचे आदेश निघण्याचे संकेत मिळत आहेत. काही बाबींमध्ये मात्र सुधारणा झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा प्रशासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही खालील प्रशासन मग्रारोहयोच्या कामात अपेक्षित प्रगती दाखवत नसल्याने आता यात काहींच्या विभागीय चौकशीचे आदेश निघण्याचे संकेत मिळत आहेत. काही बाबींमध्ये मात्र सुधारणा झाल्या आहेत.जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी जुन्या कामांचा आढावा घेतला असता फारसी सुधारणा झाल्याचे चित्र दिसत नव्हते. निदान २0१४ पर्यंतची रखडलेली कामे तरी पूर्ण करण्याचे नियोजन करा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले. त्यामुळे एका ठरावीक काळापर्यंतची रखडलेली कामे तरी पूर्ण होतील. दोन दिवसांत नियोजन सादर करण्यास सांगितले. सिंचन विहिरींची कामेही पुन्हा आहे त्याच परिस्थितीत दिसत आहेत. यात एकूण २९८७ कामे सुरू असून पूर्ण झालेली कामे ५६४ आहेत. त्यामुळे वसमतमध्ये तर मागच्या बैठकीत दिलेल्या सूचनांचेही पालन झाले नसल्याने गटविकास अधिकाºयांना धारेवर धरले. जिओ टॅगिंग, जॉब कार्ड व्हेरिफिकेशनमध्ये प्रत्येकी ४ टक्क्यांनी वाढ झाली. तर वेळेत मजुरी अदा करण्याची परिस्थितीही सुधारली आहे. तेवढीच समाधानाची बाब आहे.जिल्ह्यातील ३0 गावांमध्ये आतापर्यंत एकही मग्रारोहयोचे काम झाले नाही. अशा ग्रामपंचायतींत कामे सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले. यात औंढा तालुक्यातील ३, वसमत-९, हिंगोली-७, कळमनुरी-४, सेनगाव-७ अशी स्थिती आहे. पालकमंत्री पाणंद रस्त्याची १४ कामे सुरू झाल्याचे सांगण्यात आले. यात वसमत-३, हिंगोली-१, सेनगाव-३, औंढा-१ व कळमनुरीत ६ कामे सुरू झाली आहेत.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीgovernment schemeसरकारी योजना