शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लॉकडाऊनमुळे दीड कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

हिंगोली : कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका सराफा बाजाराला जास्त प्रमाणात बसला असून, दीड वर्षापासून जवळपास दीड कोटीची ...

हिंगोली : कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका सराफा बाजाराला जास्त प्रमाणात बसला असून, दीड वर्षापासून जवळपास दीड कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे हाताला काम नसल्यामुळे बंगाली कारागीरांनीही आपले घर जवळ केले आहे.

२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केला. आज दीड वर्ष झाले, तरी कोरोना महामारी संपुष्टात येण्याचे नाव घेत नाही. कोरोना रुग्ण वाढत असल्याचे पाहून शासन वेळोवेळी लॉकडाऊन, संचारबंदी लागू करीत आहे. दरवर्षी नाही म्हटले तरी एक ते दीड कोटींची उलाढाल हिंगोली जिल्ह्यात होत असते. मराठवाड्यातील क्रमांक एकची सोन्याची बाजारपेठ म्हणून हिंगोली जिल्ह्याकडे पाहिले जाते. परंतु, कोरोनामुळे आज सराफा बाजार पूर्णत: बंद झाला आहे. जिल्ह्यात १५०, तर शहरात ५० दुकाने सराफांची आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे सर्वच दुकाने आजमितीस बंद आहेत. गतवर्षी शासनाने कोरोना काळात थोडीबहुत सूट दिली होती. परंतु, यावेळेस मात्र दुकाने उघडण्यासाठी अजिबात सूट दिलेली नाही. आमचा लॉकडाऊनला विरोध नाही; पण दुकानांनाही काही प्रमाणात का होईना दुकाने उघडण्यास सूट दिल्यास कारागीरांच्या हाताला काम मिळते. आजमितीस नाही म्हटले तरी जवळपास ३०० कारागीरांची संख्या आहे. परंतु, हाताला काम नसल्यामुळे बंगाली, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर या भागांतून आलेल्या कारागीरांनी घर जवळ केले आहे.

अक्षय तृतीयाचा मुहूर्त गेला...

साडेतीन मुहूर्तांपैकी मुहूर्त असलेला अक्षय तृतीया हा मुहूर्तही पूर्णत: हातून गेला आहे. अक्षय तृतीयेला मौल्यवान वस्तू घेण्याकडे अनेकांचा कल असतो. पण कोरोनामुळे दुकाने बंद असल्यामुळे त्यावर पाणी फेरले गेले आहे. मोठ्या शहरात सोन्या-चांदीची ऑनलाईन नोंदणी होते. हिंगोली जिल्हा सोने-चांदीबाबत मराठवाड्यात अव्वल असला, तरी ऑंनलाईन नोंदणी मात्र झालेली नाही.

- सुधीरअप्पा सराफा, अध्यक्ष, सराफा असोसिएशन

कारागीरांवर उपासमार...

सोन्या-चांदीचे दागिने बनविणाऱ्या कारागीरांवर दीड वर्षापासून उपासमार येऊन ठेपली आहे. सराफा दुकाने बंद असल्यामुळे अनेकांनी घर जवळ केले आहे. बंगाली कारागीर तर केव्हाच निघून गेले आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतरच ते आता परत येतील. दोन पिढ्यांपासून अशी वेळ कधीच आली नसून, कोरोनामुळे आज उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. शासनाने दुकानांना परवानगी दिल्यास रोजीरोटीचा प्रश्न मिटू शकतो.

- दुर्गादास खर्जुले, सराफा कारागीर