शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

लोकसभेआडून विधानसभेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:05 IST

लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोर धरू लागली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघात युती व आघाडीचा धर्म पाळतच पुढील विधानसभेची तयारीही सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोर धरू लागली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघात युती व आघाडीचा धर्म पाळतच पुढील विधानसभेची तयारीही सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोलीसह कळमनुरी, वसमत, हदगाव, किनवट व उमरखेड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. हिंगोलीमध्ये मागच्या वेळी भाजपचे तान्हाजीराव मुटकुळे यांनी विधानसभेत बाजी मारली. १९९८ ला काँग्रेस व त्यानंतर सातत्याने सेनेला आघाडी आहे. मात्र विधानसभेत काँग्रेस बाजी मारत आला. मागच्यावेळी काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा पराभव झाला. यावेळी पुन्हा मुटकुळे व गोरेगावकर हे लोकसभेच्या निमित्ताने आपापल्या उमेदवारांसाठी मैदानात उतरून विधानसभेची रंगीत तालीम खेळण्याच्या तयारीत दिसत आहेत. तर ही जागा काँग्रेसला सुटणार असली तरीही राकाँचे दिलीप चव्हाण हेही प्रचारात मागे नाहीत. वसमतमध्येही मागच्या लोकसभेला सेनेला आघाडी होती. विधानसभेतही सेनेचे डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी बाजी मारत राकाँचे जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव केला होता. युती व आघाडीत आता हे दोघेही पुन्हा विधानसभेच्या तयारीसाठी लोकसभेच्या प्रचारात कसर सोडणार नसल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात भाजपचे शिवाजी जाधव व काँग्रेस अ.हाफिज हेही सक्रिय असून आघाडी व युतीचा धर्म पाळत आहेत. जाधव यांनी लोकसभेला उभे राहून बंडखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र माघार घेतली.कळमनुरी मतदारसंघातही काँग्रेसचे आ.संतोष टारफे व शिवसेनेचे संतोष बांगर हे आपापल्या लोकसभा उमेदवारांसाठी आपली विधानसभा निवडणूक असल्याचे समजून झटत आहेत. मागच्या वेळी सेनेकडून पराभूत माजी आ.गजानन घुगे हेही सेनेच्या प्रचारात आहेत.हदगाव विधानसभा मतदारसंघातीलच सुभाष वानखेडे हे लोकसभा लढवत असल्याने काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर पुढे त्यांचा फायदा होणार असल्याने जोरात कामाला लागले. शिवाय सेनेचे आ.नागेश पाटीलही हेमंत पाटील यांच्यासाठी प्रयत्न करून विधानसभेची वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.किनवटमध्ये मागील पंधरा वर्षांपासून सातत्याने विजयी होणारे प्रदीप नाईक यांनी काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार सुरू केला आहे. तर शिवसेना-भाजपची स्थानिक नेतेमंडळी हेमंत पाटील यांच्यासाठी कामाला लागली आहे. उमरखेडमध्येही आ.राजेंद्र नगरधने हे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीपासून सक्रिय झाले असून माजी आ.विजय खडसे हेही वानखेडेंसाठी तेवढेच प्रयत्न करताना दिसत आहेत.लोकसभा निवडणुकीतील विजय महत्त्वाचाच आहे. मात्र त्यापेक्षाही पुढील विधानसभेसाठी आपलीही तयारी होण्यासाठी प्रत्येक विधानसभा इच्छुक स्वत:हून खांद्यावर प्रचाराची धुरा घेत आहे. कार्यकर्त्यांनाही इमानेइतबारे कामाला लागण्याचा सल्ला देत आहेत. मात्र जेथे कुठे नाराजी आहे, तेथेही काम तर सुरू आहे. मात्र ते स्वत:साठी की लोकसभेच्या उमेदवारासाठी हे कळायला मार्ग नाही. निदान आपला चेहरा लोकांना दाखवण्यासाठी तरी ही मंडळी कामाला लागल्याचे दिसत आहे. बहुतांश जणांनी हीच शक्तीपरीक्षा असल्याचे समजून हाती कमान घेतली. मात्र काहींनी विधानसभेलाच काय ती परीक्षा व्हायची ते होऊन जाईल. आता केवळ तोंडओळख होण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.मागच्या लोकसभेला विधानसभेची तयारी करणाऱ्या काहींनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराशी दगाफटका केला. तर काहींनी इमानेइतबारे कामही केले. मात्र मोदी लाटेत शिवसेनेला येथील जागा राखता आली नाही. या मतदारसंघातील सर्वच जागा त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. आता परिस्थिती बदलली. दोन भाजप, दोन शिवसेना, एक काँग्रेस तर एक राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीवरून बोध घेवून यावेळी प्रत्येकाला आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. तर कार्यकर्त्यांनाही तशी संधी आहे.मागच्या लोकसभेला अनेकांनी उघडच विरोधाची भूमिका घेतली होती. यावेळी मात्र तशा मूडमध्ये कोणीच दिसत नाही. आता ही बाब परवडणारी नसल्याचे सर्वांच्याच लक्षात आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण