शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘भूमिगत गटार’मध्ये नियोजनाचा अभावच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:34 IST

अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठेच सलगता नाही. एखाद्या भागात नगरसेवकाच्या दबावानंतर काम तर सुरू होते. मात्र ते पूर्ण न करताच दुसरीकडे डेरा हलविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच अनेक भागात एकाचवेळी काम सुरू असल्याने यंत्रणेचाही अंदाज येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठेच सलगता नाही. एखाद्या भागात नगरसेवकाच्या दबावानंतर काम तर सुरू होते. मात्र ते पूर्ण न करताच दुसरीकडे डेरा हलविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच अनेक भागात एकाचवेळी काम सुरू असल्याने यंत्रणेचाही अंदाज येत नाही.हिंगोली शहरासाठी भूमिगत गटार योजना ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. मलवहन व निस्सारणाचे काम यामुळे सुरळीत होणार आहे. तर शहरात नाल्यांतून वाहणाऱ्या या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका दूर होणार आहे. मात्र हे काम करताना सुरवातीपासूनच योग्य नियंत्रणाचा अभाव राहिला आहे. आधीच डबघाईला आलेल्या जीवन प्राधिकरण विभागाकडे या योजनेची देखरेख आहे. अपुरे व सक्षम मनुष्यबळ नसल्याने हा विभाग आधीच जर्जर आहे. विविध पाणीपुरवठा योजनांची त्यामुळे वाट लागली आहे. तर प्रादेशिक योजनांची कामे होत नसल्याचे चित्र आहे. त्यातच भूमिगत गटारसारख्या अवाढव्य योजनेवर या विभागाची देखरेख आहे. खरेच हा विभाग या कामांवर नियंत्रण ठेवत आहे की नाही, हा तर वादाचाच मुद्दा आहे. अधून-मधून वर्तमानपत्रात बातम्या झळकल्या की, हा विभाग सक्रिय होतो. अन्यथा ही कामे रामभरोसेच चालत असल्याचे चित्र आहे. नगरपालिका केवळ आर्थिक नियोजनाचाच भाग सांभाळत असल्याने निश्चिंत आहे. काही भागात भूमिगत गटारच्या कामाची खोली जास्त असल्याने एकाच ठिकाणी यंत्रणा अडकून पडल्याचे दिसते. रिसाला बाजार, आदर्श कॉलेज परिसरात हे चित्र दिसते. तर काही भागात अर्धवट काम केले अन् यंत्रणा दुसरीकडे हलविली आहे. ते आता पुन्हा कधी सुरू होणार आहे, हा प्रश्नच आहे. एकंदर सर्वच भागातील काम पूर्ण झाल्याशिवाय ही योजना कार्यान्वित होणार नसली तरीही त्यातील सुसूत्रताच कामाला गती देणार आहे. नेमकी ही सुसूत्रता कोण लावणार, हा प्रश्न आहे.भूमिगत गटार योजनेच्या कामाचा ठरावीक टप्पा गाठल्याशिवाय शहरातील रस्ते विकासासाठी शासनाकडून निधी मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे हा टप्पा गाठण्यासाठी तर धरसोड होत नाही ना? हा प्रश्न आहे. तसे असल्यास निधी येऊनही कामेच पूर्ण नसलेल्या भागात कसे रस्ते करणार, याचे उत्तर कुणाकडेचनाही. दुसरे म्हणजे पावसाळा तोंडावर असल्याने काही भागातील मंजूर रस्ते तत्पूर्वी होण्यासाठी अशा भागातील भूमिगत गटारची वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा येत्या पावसाळ्यात शहरात सर्वत्रच चिखल तुडवावा लागणार आहे.यापूर्वीही भूमिगत गटार योजनेत अपुरी यंत्रणा असल्याने नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण व मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी फटकारले होते. त्यांनी पुन्हा लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली