शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

‘भूमिगत गटार’मध्ये नियोजनाचा अभावच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:34 IST

अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठेच सलगता नाही. एखाद्या भागात नगरसेवकाच्या दबावानंतर काम तर सुरू होते. मात्र ते पूर्ण न करताच दुसरीकडे डेरा हलविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच अनेक भागात एकाचवेळी काम सुरू असल्याने यंत्रणेचाही अंदाज येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठेच सलगता नाही. एखाद्या भागात नगरसेवकाच्या दबावानंतर काम तर सुरू होते. मात्र ते पूर्ण न करताच दुसरीकडे डेरा हलविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच अनेक भागात एकाचवेळी काम सुरू असल्याने यंत्रणेचाही अंदाज येत नाही.हिंगोली शहरासाठी भूमिगत गटार योजना ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. मलवहन व निस्सारणाचे काम यामुळे सुरळीत होणार आहे. तर शहरात नाल्यांतून वाहणाऱ्या या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका दूर होणार आहे. मात्र हे काम करताना सुरवातीपासूनच योग्य नियंत्रणाचा अभाव राहिला आहे. आधीच डबघाईला आलेल्या जीवन प्राधिकरण विभागाकडे या योजनेची देखरेख आहे. अपुरे व सक्षम मनुष्यबळ नसल्याने हा विभाग आधीच जर्जर आहे. विविध पाणीपुरवठा योजनांची त्यामुळे वाट लागली आहे. तर प्रादेशिक योजनांची कामे होत नसल्याचे चित्र आहे. त्यातच भूमिगत गटारसारख्या अवाढव्य योजनेवर या विभागाची देखरेख आहे. खरेच हा विभाग या कामांवर नियंत्रण ठेवत आहे की नाही, हा तर वादाचाच मुद्दा आहे. अधून-मधून वर्तमानपत्रात बातम्या झळकल्या की, हा विभाग सक्रिय होतो. अन्यथा ही कामे रामभरोसेच चालत असल्याचे चित्र आहे. नगरपालिका केवळ आर्थिक नियोजनाचाच भाग सांभाळत असल्याने निश्चिंत आहे. काही भागात भूमिगत गटारच्या कामाची खोली जास्त असल्याने एकाच ठिकाणी यंत्रणा अडकून पडल्याचे दिसते. रिसाला बाजार, आदर्श कॉलेज परिसरात हे चित्र दिसते. तर काही भागात अर्धवट काम केले अन् यंत्रणा दुसरीकडे हलविली आहे. ते आता पुन्हा कधी सुरू होणार आहे, हा प्रश्नच आहे. एकंदर सर्वच भागातील काम पूर्ण झाल्याशिवाय ही योजना कार्यान्वित होणार नसली तरीही त्यातील सुसूत्रताच कामाला गती देणार आहे. नेमकी ही सुसूत्रता कोण लावणार, हा प्रश्न आहे.भूमिगत गटार योजनेच्या कामाचा ठरावीक टप्पा गाठल्याशिवाय शहरातील रस्ते विकासासाठी शासनाकडून निधी मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे हा टप्पा गाठण्यासाठी तर धरसोड होत नाही ना? हा प्रश्न आहे. तसे असल्यास निधी येऊनही कामेच पूर्ण नसलेल्या भागात कसे रस्ते करणार, याचे उत्तर कुणाकडेचनाही. दुसरे म्हणजे पावसाळा तोंडावर असल्याने काही भागातील मंजूर रस्ते तत्पूर्वी होण्यासाठी अशा भागातील भूमिगत गटारची वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा येत्या पावसाळ्यात शहरात सर्वत्रच चिखल तुडवावा लागणार आहे.यापूर्वीही भूमिगत गटार योजनेत अपुरी यंत्रणा असल्याने नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण व मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी फटकारले होते. त्यांनी पुन्हा लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली