शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

‘भूमिगत गटार’मध्ये नियोजनाचा अभावच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:34 IST

अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठेच सलगता नाही. एखाद्या भागात नगरसेवकाच्या दबावानंतर काम तर सुरू होते. मात्र ते पूर्ण न करताच दुसरीकडे डेरा हलविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच अनेक भागात एकाचवेळी काम सुरू असल्याने यंत्रणेचाही अंदाज येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठेच सलगता नाही. एखाद्या भागात नगरसेवकाच्या दबावानंतर काम तर सुरू होते. मात्र ते पूर्ण न करताच दुसरीकडे डेरा हलविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच अनेक भागात एकाचवेळी काम सुरू असल्याने यंत्रणेचाही अंदाज येत नाही.हिंगोली शहरासाठी भूमिगत गटार योजना ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. मलवहन व निस्सारणाचे काम यामुळे सुरळीत होणार आहे. तर शहरात नाल्यांतून वाहणाऱ्या या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका दूर होणार आहे. मात्र हे काम करताना सुरवातीपासूनच योग्य नियंत्रणाचा अभाव राहिला आहे. आधीच डबघाईला आलेल्या जीवन प्राधिकरण विभागाकडे या योजनेची देखरेख आहे. अपुरे व सक्षम मनुष्यबळ नसल्याने हा विभाग आधीच जर्जर आहे. विविध पाणीपुरवठा योजनांची त्यामुळे वाट लागली आहे. तर प्रादेशिक योजनांची कामे होत नसल्याचे चित्र आहे. त्यातच भूमिगत गटारसारख्या अवाढव्य योजनेवर या विभागाची देखरेख आहे. खरेच हा विभाग या कामांवर नियंत्रण ठेवत आहे की नाही, हा तर वादाचाच मुद्दा आहे. अधून-मधून वर्तमानपत्रात बातम्या झळकल्या की, हा विभाग सक्रिय होतो. अन्यथा ही कामे रामभरोसेच चालत असल्याचे चित्र आहे. नगरपालिका केवळ आर्थिक नियोजनाचाच भाग सांभाळत असल्याने निश्चिंत आहे. काही भागात भूमिगत गटारच्या कामाची खोली जास्त असल्याने एकाच ठिकाणी यंत्रणा अडकून पडल्याचे दिसते. रिसाला बाजार, आदर्श कॉलेज परिसरात हे चित्र दिसते. तर काही भागात अर्धवट काम केले अन् यंत्रणा दुसरीकडे हलविली आहे. ते आता पुन्हा कधी सुरू होणार आहे, हा प्रश्नच आहे. एकंदर सर्वच भागातील काम पूर्ण झाल्याशिवाय ही योजना कार्यान्वित होणार नसली तरीही त्यातील सुसूत्रताच कामाला गती देणार आहे. नेमकी ही सुसूत्रता कोण लावणार, हा प्रश्न आहे.भूमिगत गटार योजनेच्या कामाचा ठरावीक टप्पा गाठल्याशिवाय शहरातील रस्ते विकासासाठी शासनाकडून निधी मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे हा टप्पा गाठण्यासाठी तर धरसोड होत नाही ना? हा प्रश्न आहे. तसे असल्यास निधी येऊनही कामेच पूर्ण नसलेल्या भागात कसे रस्ते करणार, याचे उत्तर कुणाकडेचनाही. दुसरे म्हणजे पावसाळा तोंडावर असल्याने काही भागातील मंजूर रस्ते तत्पूर्वी होण्यासाठी अशा भागातील भूमिगत गटारची वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा येत्या पावसाळ्यात शहरात सर्वत्रच चिखल तुडवावा लागणार आहे.यापूर्वीही भूमिगत गटार योजनेत अपुरी यंत्रणा असल्याने नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण व मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी फटकारले होते. त्यांनी पुन्हा लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली