शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

रॉकेलचा कोटा ९६ हजार लिटरने घटला

By admin | Updated: April 29, 2015 15:51 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याच्या केरोसिनच्या कोट्यात पुन्हा एकदा कपात केली आहे. यावेळी दर महिन्याचा हा कोटा ९६ ...

औरंगाबाद : केंद्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याच्या केरोसिनच्या कोट्यात पुन्हा एकदा कपात केली आहे. यावेळी दर महिन्याचा हा कोटा ९६ हजार लिटरने कमी झाला आहे. परिणामी जिल्ह्याला यापुढे महिन्याकाठी १७ लाख ४ हजार लिटर इतकेच रॉकेल मिळणार आहे. सामान्य नागरिकांना स्वयंपाक आणि दिवाबत्तीसाठी केंद्र सरकारकडून सवलतीच्या दरात रॉकेलचा पुरवठा केला जातो. मात्र, स्वयंपाकासाठी गॅसचा वापर वाढत असल्यामुळे सरकारकडून सातत्याने रॉकेलचा कोटा कमी केला जात आहे. गेल्या साडेचार वर्षांत आतापर्यंत सहाव्यांदा हा कोटा कमी करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्याला दर महिन्याला १९ लाख ९२ हजार लिटर रॉकेल मिळत होते. मात्र डिसेंबर महिन्यात हा कोटा ३९ टक्क्यांनी कमी करून तो १२ लाख ३६ हजार लिटर करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोटा कमी करण्यात आल्यामुळे त्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने झाली. त्याची दखल घेत सरकारने हा कोटा पुन्हा काहीसा वाढवून तो १८ लाख लिटर केला. परंतु आता एप्रिलपासून यात पुन्हा कपात करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार यापुढे जिल्ह्याला १७ लाख ४ हजार लिटर इतकेच रॉकेल मिळणार आहे. रॉकेलचा कोटा कमी झाल्यामुळे विशेषत: ग्रामीण नागरिकांची गैरसोय होणार आहे. साडेचार वर्षांत ७५ टक्के कपातसाडेचार वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यास महिन्याला ६८ लाख लिटर रॉकेल मिळत होते. आतापर्यंत सहा वेळा यात कपात केली गेली. आता हा कोटा ६८ लाख लिटरवरून १७ लाख ४ हजार लिटरवर आला आहे. जिल्ह्यात एकूण ७ लाख २१ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. यातील ग्रामीण भागातील बहुतेक कुटुंबे स्वयंपाकासाठी तसेच दिवाबत्तीसाठी आजही रॉकेलचाच वापर करतात. साडेचार वर्षांपूर्वी शिधापत्रिकाधारकांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे दोन लिटरप्रमाणे रॉकेल मिळत होते. आता कोटा सातत्याने कमी कमी झाल्यामुळे एका कुटुंबामागे प्रत्येकी दोन लिटर इतकेच रॉकेल मिळत आहे.