शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी पास नसलेल्या ३२ शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

१३ फेब्रुवारी २०१३ मध्ये शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण असल्याशिवाय नियुक्ती देऊ नये, असा आदेश आला होता. मात्र दरम्यानच्या काळात हा ...

१३ फेब्रुवारी २०१३ मध्ये शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण असल्याशिवाय नियुक्ती देऊ नये, असा आदेश आला होता. मात्र दरम्यानच्या काळात हा निर्णय जिल्हा परिषदांना पोहोचेपर्यंत अथवा काहींनी पळवाट शोधत अशा शिक्षकांना नियुक्त्या दिल्या होत्या. त्यानंतर या शिक्षकांना एकदा सेवेत घेतले तर सहानुभूती म्हणून त्यांना संधीही देण्यासाठी शासनाने वारंवार मुदतवाढ दिली. मात्र त्या वेळेतही अनेक शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत. त्यामुळे २०१९ मध्ये अनेक शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले. त्यावेळी काहींनी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र सादर केल्याने ते या कारवाईतून बचावले. मात्र ज्यांना हे प्रमाणपत्र सादर करता आले नाही. त्यांच्या सेवेवरच गंडांतर येण्याची चिन्हे निर्माण झाल्याने काहीजण न्यायालयात गेले होते. हिंगोली जिल्ह्यात टीईटी उत्तीर्ण नसताना ५५ शिक्षकांना नियुक्ती मिळाली होती. त्यापैकी २३ नंतर उत्तीर्ण झाले. तर ३२ जणांचा प्रश्न अजूनही कायम आहे. काहीजण दिलेल्या मुदतीनंतर उत्तीर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांचे काय करायचे? हाही प्रश्नच आहे. दुसरीकडे विनाअनुदानित अथवा कायम विनाअदुनित शिक्षकांच्या टीईटीची तर आकडेवारीच नाही. त्यांना शासनाचे वेतन मिळत नसल्याने त्याची चाचपणीही कुणी करीत नाही. तसे त्यांनाही टीईटी उत्तीर्ण शिक्षकांचे बंधन आहे.

टीईटी पात्र नसलेले शिक्षक ५५

अनुदानित शाळांतील शिक्षक ५५

विनाअनुदानित शाळांतील शिक्षक आकडेवारी नाही

कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षक आकडेवारी नाही

शिक्षक म्हणतात

उच्च न्यायालयाने आमच्या टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या ८९ याचिका फेटाळल्या. यामुळे २५ हजार अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षकांच्या नोकरीला धोका निर्माण झाला आहे. मुळात २०१३ पासून शासनाने टीईटीबाबत नेहमीच गोंधळ घातला आहे. सेवेतील शिक्षकांना टीईटी अनिवार्य बाबत २०१६ साली शासनाने शासननिर्णय घेतला आणि पुढील तीन संधीमध्ये उत्तीर्ण होणे बंधनकारक केले. परंतु शासनाने दोनदाच परीक्षा घेतली. शासनाने सेवेतील शिक्षकांना तीन संधी देण्याबाबत निर्णय घ्यावा.

- विजय येवले, शिक्षक

जिल्ह्यातील एकूण शिक्षक ७५००

अनुदानित शाळांतील शिक्षक १६२०

विनाअनुदानित शाळांतील शिक्षक ८९

कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षक १८००

शिक्षक संघटनांचा विरोध

ज्या शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण केली नाही. अशांना शासनाने संधी दिली होती. त्यातही ते उत्तीर्ण न झाल्याने वेतन बंद करण्यात आले होते. काही शिक्षक न्यायालयात गेले होते. त्यानंतर आता हे आदेश आले आहेत. पुढील निर्देशाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

-पी.बी. पावसे, शिक्षणाधिकारी