शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तर दिला, मुलाचे शिक्षण अद्यापही बाकी, हीच चिंता सतावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST

हिंगोली : स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तर दिला आहे. सध्या चिंता दुसरी कोणती नसून मुलाच्या शिक्षणाचीच आहे. कारण ...

हिंगोली : स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तर दिला आहे. सध्या चिंता दुसरी कोणती नसून मुलाच्या शिक्षणाचीच आहे. कारण तो सध्या दहावी वर्गात शिक्षण घेत आहे.

राज्य परिवहन महामंडळाने ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली आहे. १ जानेवारी २००० रोजी मी चालक पदावर एस. टी. महामंडळात रुजू झालो. या दरम्यान विनाअपघात सेवा केली आहे. अजून माझे ७ वर्षे बाकी आहेत. सध्या माझे वय ५१ वर्षे असून ५ डिसेंबर २०१९ रोजी शासनाच्या स्वेच्छा निवृत्ती योजनेनुसार कोणाच्या सांगण्यावरुन स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला नाही तर स्वेच्छेने दिला आहे. महामंडळात माझी २० वर्षे सेवा होत आहे.

भिकाजी सखाराम सोनटक्के अर्ज दिल्यानंतर म्हणाले, हिंगोली शहरातील पंढरपूरनगर मध्ये छोटेसे घर असून घरामध्ये वडील, पत्नी आणि मुलगा आहे. १९ हजाराच्या पगारावरच तिन्ही मुलींचे लग्नही केले आहे. माझे नशिब चांगले आहे. घरात कोणत्याही सदस्यांना कोणताच आजार नाही. आता चिंता एकच आहे ती म्हणजे मुलाचे शिक्षण बाकी आहे. एकदा मुलगा स्वत:च्या पायावर उभा राहिला की, मी या चिंतेतून मुक्त होतो. घर संसार चालविण्यासाठी मी यापुढे एखादे वाहन विकत घेणार असून त्या पैशातूनच घर चालविणार आहे.

स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेतल्यास काय मिळणार?

स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज अधिकारी-कमर्मचाऱ्यांनी दिल्यास त्यांचे नोकरीचे पुढील जेवढे महिने राहिले असतील त्याचे पैसे शासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत. आजमितीस माझे वय ५१ वर्षे आहे. मी ५ डिसेंबर रोजी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला आहे. मला पुढील तीन महिन्यांचा पगार मिळणार आहे. याचबरोबर ग्रॅच्युटी, पीएफ हेही शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणार आहे. सध्या मला २७ हजार पगार असून तीन महिन्यांचा पगार एकदाच मिळत आहे, हाच फायदा आहे.

कर्मचाऱ्याचा कोट

एस. टी. महामंडळात चालक पदावर मी सध्या कार्यरत आहे. स्वेच्छा निवृत्तीचा आलेला पैसा मी बँकेत ठेवणार आहे. हाच पैैसा मुलाच्या शिक्षणासाठी वापरणार असून त्यातून शिक्षण पूर्ण करणार आहे.

- भिकाजी सखाराम सोनटक्के

चालक, एस. टी. महामंडळ, हिंगोली

कर्मचारी पत्नीचा कोट

शासनाच्या धोरणानुसार माझ्या पतीने स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला आहे. माझ्या पतीने विनाअपघात २० वर्षे सेवा केली म्हणून शासनाने मानधन स्वरुपात कमीत कमी पाच हजार रुपये महिना द्यावा.

कर्मचारी पत्नीचा कोट

शासनाच्या धोरणानुसार माझ्या पतीने स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला आहे. माझ्या पतीने विनाअपघात २० वर्षे सेवा केली म्हणून शासनाने मानधन स्वरुपात कमीत कमी पाच हजार रुपये महिना द्यावा.

- चंद्रकला भीकाजी सोनटक्के, पंढरपूरनगर, हिंगोली