शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST

मार्च २०२० पासून कोरोना आजारामुळे सर्वच शाळा व महाविद्यालय पूर्णपणे बंदच आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काही शिक्षकांनी ...

मार्च २०२० पासून कोरोना आजारामुळे सर्वच शाळा व महाविद्यालय पूर्णपणे बंदच आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काही शिक्षकांनी ऑनलाईन वर्ग सुरु केले होते. त्यावेळी काही विद्यार्थ्यानी ऑनलाईन वर्गाचा लाभ घेतला तर काहींना ऑनलाईन वर्ग अँड्रॉईड मोबाईल नसल्यामुळे लाभ घेता आला नाही. यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. आता परीक्षा तोंडावर येवून ठेपली आहे. आजमितीस १० वीचा अभ्यासक्रम १५ टक्के झाला आहे तर १२ वीचा अभ्यासक्रम १० टक्के जवळपास झाला आहे. वर्गामध्ये जेवढे शिक्षण चांगल्याप्रकारे घेता येते तेवढे शिक्षण ऑनलाईन वर्गामुळे होऊ शकत नाही, यामुळे पालकांना आपल्या पाल्याची चिंता वाटू लागली आहे.

दहावीचा अभ्यासक्रम

शाळा सुरु होऊन वीस दिवस पूर्ण झाले आहेत. दहावीचा अभ्यासक्रम १५ टक्के जवळपास पूर्ण झाला आहे.विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने अभ्यासक्रमही कमी केला आहे. मोजक्याच धड्यावर विद्यार्थ्याची परीक्षा होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण येणार आहे. मार्च महिन्यापर्यत अभ्यासपूर्ण केला जाऊ शकतो, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन व जास्तीचे वर्गही घेतले जात आहेत.

बारावीचा अभ्यासक्रम

बारावीचा अभ्यासक्रम हा १५ दिवसांपूर्वी सुरु झाला असून १० टक्के जवळपास अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. दोन ते तीन धडेही यात पूर्ण झाले आहेत. अजून अभ्यासक्रम पूर्ण होणे बाकी आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जास्तीचे तासही घेतले जात आहेत. मे महिन्यापर्यत अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो, असे वाटते.

प्रतिक्रया

दहावीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला जाईल. यासाठी जास्तीचे वर्गही घेतले जातील. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.वेळप्रसंगी ऑनलाईन वर्गही घेतले जातील.

-बी. जे. पतंगे, मुख्याध्यापक,

परीक्षा तोंडावर असली तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. वेळप्रसंगी जास्तीचे वर्गही घेतले जातील. वार्षिक परीक्षेपूर्वी अभ्यासक्रमपूर्ण केला जाईल.

-जे. जे. काळे, प्राचार्य

विद्यार्थी

१) परीक्षा तोंडावर असून अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही, त्यामुळे थोडी चिंता वाटते. परीक्षेची तारीख अजून माहिती नाही. परीक्षेच्या दृष्टीने मी सध्या अभ्यास करीत आहेत. अर्धा जवळपास अभ्यासक्रम झााल आहे.

-पवन संगेवार (विद्यार्थी), हिंगोली

२)