शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

संचारबंदी लागू होताच हिंगोलीकरांची उडाली धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:37 IST

हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून जिल्ह्यात सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेदरम्यान संचारबंदी लागू केली ...

हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून जिल्ह्यात सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेदरम्यान संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी लागू होताच हिंगोलीकरांची मात्र चांगलीच धांदल उडाल्याचे पहायला मिळाले.

मंगळवारी जिल्ह्यात कोरोनाचे ३८ रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला आहे. हे पाहून जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात २४ फेब्रुवारीपासून सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जारी केले आहेत. बुधवारी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गांधी चौक, महावीर चौक, भाजी मंडई, बसस्थानक परिसर, इंदिरा चौक, कापड गल्ली आदी भागांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात येत होते. या पथकात पथकप्रमुख डी. पी. शिंदे, पंडित मस्के,प्रवीण चव्हाण, अमर ठाकूर, पवन खरात यांचा समावेश होता. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून ध्वनिक्षेपकाद्वारे शहरातील दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. यानंतर सायंकाळी सात वाजता सर्वत्र सामसूम दिसून आल्याचे पहायला मिळाले.