शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली तालुक्यात पुन्हा ईपॉसवर रेशन साठा दिसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:28 IST

हिंगोली : तालुक्यात मागच्या महिन्याप्रमाणे या महिन्यातही ई पॉस मशिनवर धान्याचा साठा दिसत नसल्याने अडचण होत असून इतर तालुक्यांचे ...

हिंगोली : तालुक्यात मागच्या महिन्याप्रमाणे या महिन्यातही ई पॉस मशिनवर धान्याचा साठा दिसत नसल्याने अडचण होत असून इतर तालुक्यांचे वाटप तीस ते चाळीस टक्क्यांच्या आसपास असताना हिंगोलीत मात्र वाटपच सुरू नाही.

मागच्या महिन्यापासून हिंगोली तालुक्यात ई पॉस मशिनवर धान्य साठ्याची नोंद न होण्याची नवी समस्या उभी राहिली आहे. आधीच ऑफलाईन पद्धतीने वाटप केल्याने यापूर्वीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या स्वस्त धान्य दुकानदार व तहसील यंत्रणेला या नव्या समस्येने पुन्हा ग्रासले आहे. याची नेमकी जबाबदारी कुणाची? हेच कळायला मार्ग नाही. इतर तालुक्यांत हे सगळे एकदम सुव्यस्थितरीत्या चालत असताना हिंगोलीतच नेमकी काय अडचण? हा प्रश्न दुकानदारांना सतावत आहे. कुणी वाहतूक कंत्राटदाराकडे बोट दाखवते, कुणी गोदामपालाकडे तर कुणी तहसीलच्या पुरवठा विभागाकडे तर कुणी मंत्रालयाकडे? मात्र या साखळीतील नेमक्या कोणाच्या चुकीमुळे हा प्रकार घडतोय हे कळायला मार्ग नाही. याशिवाय एनआयसीतूनही होत नसल्याचे सांगितले जाते.

जिल्ह्यातील इतर तालुक्यात मात्र ही प्रक्रिया पूर्ण होवून धान्याचे वाटपही सुरू झाले आहे. काही तालुक्यांचे वाटप तर तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत झाले आहे. हिंगोली तालुक्यात मात्र दुकानदार रोज मशिन घेवून धान्यसाठा आला का याची तपासणी करतात आणि पुन्हा गुंडाळून ठेवत परत जात आहेत. त्यामुळे लाभार्थीही आता दुकानदारच माल हडपत असल्याचा आरोप करू लागले आहेत. अनेक ठिकाणी लाभार्थी वादही घालू लागले आहेत.

याशिवाय हिंगोली व कळमनुरी तालुक्यात मोफत चना डाळही मिळत नसल्याची ओरड आहे. मात्र जुनी शिल्लक राहिलेली चना डाळ काही गावांतच मिळाली असून सर्व ठिकाणी ती वाटप झाली नसल्याचे सांगण्यात आले.

याबाबत तहसीलदार पांडुरंग माचेवाड म्हणाले, प्राधान्य कुटुंबाचा साठा अपलोड होत होता. मात्र अंत्योदयची अडचण होती. दोन दिवसांपूर्वी यासाठी सक्त सूचना दिल्या होत्या. आता ही समस्या राहणार नाही, याची काळजी घेवू.

याबाबत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिकुलाल बाहेती म्हणाले की, मागच्या महिन्यापासून ही समस्या आहे. याबाबत आम्ही प्रशासनालाही कळविले आहे. मात्र ही समस्या सुटली नाही. त्यामुळे आम्हाला लाभार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे.