शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत टंचाई; ८0 टक्के गावांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:19 IST

संभाव्य टंचाईग्रस्त गावांत करायच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाकडून सर्वेत्रणाचे काम सुरू असून ते ८0 टक्के पूर्र्ण झाले आहे. उर्वरित कामही येत्या २0 मार्चपर्यंत पूर्ण करून अंतिम आराखडा सादर करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : संभाव्य टंचाईग्रस्त गावांत करायच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाकडून सर्वेत्रणाचे काम सुरू असून ते ८0 टक्के पूर्र्ण झाले आहे. उर्वरित कामही येत्या २0 मार्चपर्यंत पूर्ण करून अंतिम आराखडा सादर करण्यात येणार आहे.हिंगोली जिल्ह्यात २0१७-१८ या आर्थिक वर्षात पाणीटंचाईवर उपायासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून नवीन विंधन विहिरींसाठी प्रस्तावित केलेल्या ३५९ पैकी २८0 गावांत सर्वेक्षण झाले. यात १९४ गावांत विंधन विहिरीची कामे प्रस्तावित केली आहेत. यात औंढ्यात ४१ गावांतील ५६ योजनांपैकी २४, वसमत तालुक्यात २३ गावांतील ४३ योजनांपैकी २७, हिंगोलीत ८५ गावांतील १0१ योजनांपैकी ३८, कळमनुरीत ४३ गावांतील ७१ योजनांपैकी ३७, सेनगावातील ८८ गावांतील १५१ योजनांपैकी ६८ योजनांना नवीन विंधन विहिरी घेणे योग्य असल्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.नळयोजनांच्या दुरुस्तीची ११८ गावे प्रस्तावित आहेत. त्यापैकी १0६ गावांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. यामध्ये औंढ्यातील १९ पैकी १६ योग्य, वसमतच्या ९ पैकी ३ योग्य, हिंगोलीत २७ पैकी ९ योग्य, कळमनुरीच्या ३२ पैकी २४ योग्य, सेनगावच्या १९ पैकी १0 योजनांची दुरुस्ती करणे योग्य असल्याचा भूवैज्ञानिक कार्यालयाचा अहवाल आहे.जिल्ह्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांतील सर्वेक्षणाचे १00 टक्के काम २0 मार्चपर्यंत पूर्ण होणार असल्याचे भूवैज्ञानिक विभागाचे सी.डी. चव्हाण यांनी सांगितले.पाणीपातळी खालावलीजिल्ह्यातील ५0 निरीक्षण विहिरींची २0१८ च्या जानेवारी महिन्यातील पाणीपातळी तत्पूर्वीच्या पाच वर्षांतील पातळीपेक्षा सरासरी तब्बल २.२१ मीटरने खालावली आहे. यात औंढ्याची ५.१८ वरून ५.८१, वसमतला ६.१२ वरून ११.३७, हिंगोलीत ५.७0 वरून ७.५३, कळमनुरीत ४.६७ वरून ६.२0, सेनगावात ५.७४ वरून ७.५७ मीटर खोलीवर गेली आहे.तात्पुरती पूरक योजनेसाठी २९ गावे प्रस्तावित होती. यापैकी २0 गावांत सर्वेक्षण पूर्ण झाले. यात औंढ्यांत १ सर्वेक्षण झाले. मात्र तो योग्य नाही. वसमत तालुक्यात ४ पैकी १, हिंगोलीत ८ पैकी ४, कळमनुरीत ४ पैकी ४, सेनगावात ३ पैकी एका काम योग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे.आधीच भूवैज्ञानिक कार्यालयाकडे वरिष्ठ व कनिष्ठ भूवैज्ञानिक ही दोन पदे रिक्त आहेत. तर जि.प.त सहायक भूवैज्ञानिक व कनिष्ठ भूवैज्ञानिकाचे पद रिक्त आहे. जि.प.च्या एक व जीएसडीएच्या दोन जणांनी हे काम मार्चमध्येच या स्तरावर आणून ठेवले आहे.दरवर्षीच जिल्हा भूजल सर्वेक्षण यंत्रणेला वाहन नाही, मनुष्यबळ नाही म्हणून टंचाईचा सर्व्हे जूनपर्यंत रखडतो. यंदा मात्र तांत्रिक अधिकाºयांची पदे रिक्त असतानाही हे काम पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे, हे विशेष.