शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

हिंगोलीत टंचाई; ८0 टक्के गावांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:19 IST

संभाव्य टंचाईग्रस्त गावांत करायच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाकडून सर्वेत्रणाचे काम सुरू असून ते ८0 टक्के पूर्र्ण झाले आहे. उर्वरित कामही येत्या २0 मार्चपर्यंत पूर्ण करून अंतिम आराखडा सादर करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : संभाव्य टंचाईग्रस्त गावांत करायच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाकडून सर्वेत्रणाचे काम सुरू असून ते ८0 टक्के पूर्र्ण झाले आहे. उर्वरित कामही येत्या २0 मार्चपर्यंत पूर्ण करून अंतिम आराखडा सादर करण्यात येणार आहे.हिंगोली जिल्ह्यात २0१७-१८ या आर्थिक वर्षात पाणीटंचाईवर उपायासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून नवीन विंधन विहिरींसाठी प्रस्तावित केलेल्या ३५९ पैकी २८0 गावांत सर्वेक्षण झाले. यात १९४ गावांत विंधन विहिरीची कामे प्रस्तावित केली आहेत. यात औंढ्यात ४१ गावांतील ५६ योजनांपैकी २४, वसमत तालुक्यात २३ गावांतील ४३ योजनांपैकी २७, हिंगोलीत ८५ गावांतील १0१ योजनांपैकी ३८, कळमनुरीत ४३ गावांतील ७१ योजनांपैकी ३७, सेनगावातील ८८ गावांतील १५१ योजनांपैकी ६८ योजनांना नवीन विंधन विहिरी घेणे योग्य असल्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.नळयोजनांच्या दुरुस्तीची ११८ गावे प्रस्तावित आहेत. त्यापैकी १0६ गावांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. यामध्ये औंढ्यातील १९ पैकी १६ योग्य, वसमतच्या ९ पैकी ३ योग्य, हिंगोलीत २७ पैकी ९ योग्य, कळमनुरीच्या ३२ पैकी २४ योग्य, सेनगावच्या १९ पैकी १0 योजनांची दुरुस्ती करणे योग्य असल्याचा भूवैज्ञानिक कार्यालयाचा अहवाल आहे.जिल्ह्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांतील सर्वेक्षणाचे १00 टक्के काम २0 मार्चपर्यंत पूर्ण होणार असल्याचे भूवैज्ञानिक विभागाचे सी.डी. चव्हाण यांनी सांगितले.पाणीपातळी खालावलीजिल्ह्यातील ५0 निरीक्षण विहिरींची २0१८ च्या जानेवारी महिन्यातील पाणीपातळी तत्पूर्वीच्या पाच वर्षांतील पातळीपेक्षा सरासरी तब्बल २.२१ मीटरने खालावली आहे. यात औंढ्याची ५.१८ वरून ५.८१, वसमतला ६.१२ वरून ११.३७, हिंगोलीत ५.७0 वरून ७.५३, कळमनुरीत ४.६७ वरून ६.२0, सेनगावात ५.७४ वरून ७.५७ मीटर खोलीवर गेली आहे.तात्पुरती पूरक योजनेसाठी २९ गावे प्रस्तावित होती. यापैकी २0 गावांत सर्वेक्षण पूर्ण झाले. यात औंढ्यांत १ सर्वेक्षण झाले. मात्र तो योग्य नाही. वसमत तालुक्यात ४ पैकी १, हिंगोलीत ८ पैकी ४, कळमनुरीत ४ पैकी ४, सेनगावात ३ पैकी एका काम योग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे.आधीच भूवैज्ञानिक कार्यालयाकडे वरिष्ठ व कनिष्ठ भूवैज्ञानिक ही दोन पदे रिक्त आहेत. तर जि.प.त सहायक भूवैज्ञानिक व कनिष्ठ भूवैज्ञानिकाचे पद रिक्त आहे. जि.प.च्या एक व जीएसडीएच्या दोन जणांनी हे काम मार्चमध्येच या स्तरावर आणून ठेवले आहे.दरवर्षीच जिल्हा भूजल सर्वेक्षण यंत्रणेला वाहन नाही, मनुष्यबळ नाही म्हणून टंचाईचा सर्व्हे जूनपर्यंत रखडतो. यंदा मात्र तांत्रिक अधिकाºयांची पदे रिक्त असतानाही हे काम पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे, हे विशेष.