शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

हिंगोली दहाव्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

हिंगोली : कोरोना लसीकरणात सुरुवातीला आघाडीवर असलेला हिंगोली जिल्हा आता दहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आजपर्यंत ठरलेल्या नियोजनानुसार ८५.२ ...

हिंगोली : कोरोना लसीकरणात सुरुवातीला आघाडीवर असलेला हिंगोली जिल्हा आता दहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आजपर्यंत ठरलेल्या नियोजनानुसार ८५.२ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील पाच केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे.

हिंगोली जिल्ह्यात ६५०० लसींचा साठा प्राप्त झाला होता. यात जवळपास तीन हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण हाेणार आहे. काही डोस वेस्ट जाणार आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सुरुवातीला ठरवलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण होत असल्याने जिल्हा अव्वल स्थानी होता. आता काही जिल्ह्यांत उद्दिष्टापेक्षाही जास्तीचे काम होत असल्याचे दिसून येत आहे.

अनेक कर्मचारी व अधिकारी मध्यंतरी ही लस घेण्यास घाबरत होते. काहींना अंग जड पडणे, डोकेदुखी, ताप येणे असा त्रास होत होता. त्यामुळे गंभीर त्रास कुणालाच झाला नाही. मात्र, तरीही काही अधिकारी व कर्मचारी ही लस घेण्यासाठी चालढकल करीत असल्याचे समोर आले होते. आता पुन्हा पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. जर या कर्मचाऱ्यांना त्रास झाला तर लसीकरणावर परिणाम होणार नाही, याची काळजी म्हणून सध्या फक्त खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होत आहे.

जिल्ह्याला डोसचा दुसरा साठा कधी मिळणार?

हिंगोली जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात ६५०० डोस प्राप्त झाले होते. त्यातून ३ हजार कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना या बॅचची लस दिली. त्याच बॅचची एक लस राखीव ठेवली असून ती या कर्मचाऱ्यांना मर्यादित कालावधीनंतर दिली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात महसूल कर्मचाऱ्यांना लस दिली जाण्याची शक्यता असून त्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा डाटा गोळा करण्यास सांगितले आहे. तो वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबत सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी काय नियोजन करायचे याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार ३१ जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात एकूण ३ हजार आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत २३०१ जणांना ही लस दिली आहे. जिल्ह्यातील पाच केंद्रांवरून हे काम सुरू आहे. येत्या बुधवारपर्यंत जिल्ह्याचे १०० टक्के लसीकरण उद्दिष्ट पूर्ण होईल.

-डाॅ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

महिलांचे प्रमाण जास्त

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या लसीकरणामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, डाॅक्टर महिलांची संख्या मोठी असल्याने त्यांचे प्रमाणही लसीकरणात जास्त आहे. ६० ते ७० टक्के महिलाच असल्याचे दिसून येत आहे, तर महिला लस घेण्यासाठी पुढे येत आहेत.

धुळे १०८ टक्के

अमरावती १०६ टक्के

बीड ९९ टक्के

वर्धा ९६.५ टक्के

सातारा ९३.९ टक्के