शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

हिंगोलीतील धान्य घोटाळ्याच्या चौकशीचा फार्सच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:30 IST

हिंगोली तालुक्यात जानेवारी ते जुलै २०१९ या काळात १६ हजार २६७ क्विंटल गहू व तांदूळ जास्तीचा उचलून ऑफलाइन ...

हिंगोली तालुक्यात जानेवारी ते जुलै २०१९ या काळात १६ हजार २६७ क्विंटल गहू व तांदूळ जास्तीचा उचलून ऑफलाइन वाटपात अनियमिततेचा आरोप करण्यात आला होता. या धान्याची बाजारभावाप्रामाणे ४.६१ कोटी रुपये एवढी किंमत होते. याबाबत आधी जिल्हा पुरवठा विभागाकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविल्यानंतर त्यात त्रुटी काढण्यात आल्या. त्यामुळे हा अहवाल पुन्हा प्रलंबित पडला होता. त्यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही पुन्हा यात काही फारसे समोर आले नाही. त्यानंतर मध्यंतरी पुन्हा या प्रकरणातील तक्रारींनी तोंड वर काढले होते. आता पुन्हा या प्रकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या या समितीत तब्बल १७ पथके आहेत. मात्र, ही पथके हिंगोली तहसीलच्या कर्मचाऱ्यांची आहेत. त्यात जुन्या तहसीलदारांच्या काळातील हे प्रकरण असले तरीही सध्याच्या तहसीलदारांचाही या समितीत समावेश आहे. यापेक्षा दुसऱ्या तालुक्यातील पथकांकडून समितीने तपासणी केली असती तर अधिक वस्तुनिष्ठ अहवाल समोर आला असता, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता पुन्हा त्याच तहसीलची चौकशी त्याच तहसीलचे कर्मचारी करीत असल्याबाबत ओरड सुरू असल्याची दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाकडून वेळकाढू धोरण राबवत नुसत्या चौकशांचा फार्स सुरू असल्याने सत्य परिस्थिती समोर येत नाही. कदाचित घोटाळा झाला असेल तर संबंधितांना शिक्षा होणे अपरिहार्य आहे. मात्र काही दोष नसेल तर त्यांना नाहकच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यात १६५ स्वस्त धान्य दुकानदारांनाही नेमका दोष कळत नसल्याने त्यांचाही जीव टांगणीला आहे. कदाचित यात अनियमितता झाली असेल तर ती एवढ्या दिवसांत तरी स्पष्टपणे समोर येणे अपेक्षित होते. मात्र, तसे काहीच अहवालातून म्हटले जात नसल्यानेच विभागीय आयुक्तांनीही फटकारल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण अशाच पद्धतीने हाताळले गेले तर कायम चर्चेचा विषय राहणार आहे. चौकशी कधी पूर्ण होणार? याच एका प्रश्नावर पुन्हा पुन्हा अडलेले दिसणार आहे. सेनगाव तालुक्यातही अशा प्रकरणात दोष स्पष्ट झाला, नावे निश्चित झाली. कारवाई झाली, वसुलीही झाली. मात्र, हिंगोली तालुक्याच्या प्रकरणात असे काहीच स्पष्टपणे समोर येत नसल्याने हा विषय मागील वर्षभरापासून चर्चेचा बनला आहे.