शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
3
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
4
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
5
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
6
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
7
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
8
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
9
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
10
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
11
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
12
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
13
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
14
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
15
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
16
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
17
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
18
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
19
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
20
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर

हिंगोलीतील धान्य घोटाळ्याच्या चौकशीचा फार्सच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:30 IST

हिंगोली तालुक्यात जानेवारी ते जुलै २०१९ या काळात १६ हजार २६७ क्विंटल गहू व तांदूळ जास्तीचा उचलून ऑफलाइन ...

हिंगोली तालुक्यात जानेवारी ते जुलै २०१९ या काळात १६ हजार २६७ क्विंटल गहू व तांदूळ जास्तीचा उचलून ऑफलाइन वाटपात अनियमिततेचा आरोप करण्यात आला होता. या धान्याची बाजारभावाप्रामाणे ४.६१ कोटी रुपये एवढी किंमत होते. याबाबत आधी जिल्हा पुरवठा विभागाकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविल्यानंतर त्यात त्रुटी काढण्यात आल्या. त्यामुळे हा अहवाल पुन्हा प्रलंबित पडला होता. त्यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही पुन्हा यात काही फारसे समोर आले नाही. त्यानंतर मध्यंतरी पुन्हा या प्रकरणातील तक्रारींनी तोंड वर काढले होते. आता पुन्हा या प्रकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या या समितीत तब्बल १७ पथके आहेत. मात्र, ही पथके हिंगोली तहसीलच्या कर्मचाऱ्यांची आहेत. त्यात जुन्या तहसीलदारांच्या काळातील हे प्रकरण असले तरीही सध्याच्या तहसीलदारांचाही या समितीत समावेश आहे. यापेक्षा दुसऱ्या तालुक्यातील पथकांकडून समितीने तपासणी केली असती तर अधिक वस्तुनिष्ठ अहवाल समोर आला असता, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता पुन्हा त्याच तहसीलची चौकशी त्याच तहसीलचे कर्मचारी करीत असल्याबाबत ओरड सुरू असल्याची दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाकडून वेळकाढू धोरण राबवत नुसत्या चौकशांचा फार्स सुरू असल्याने सत्य परिस्थिती समोर येत नाही. कदाचित घोटाळा झाला असेल तर संबंधितांना शिक्षा होणे अपरिहार्य आहे. मात्र काही दोष नसेल तर त्यांना नाहकच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यात १६५ स्वस्त धान्य दुकानदारांनाही नेमका दोष कळत नसल्याने त्यांचाही जीव टांगणीला आहे. कदाचित यात अनियमितता झाली असेल तर ती एवढ्या दिवसांत तरी स्पष्टपणे समोर येणे अपेक्षित होते. मात्र, तसे काहीच अहवालातून म्हटले जात नसल्यानेच विभागीय आयुक्तांनीही फटकारल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण अशाच पद्धतीने हाताळले गेले तर कायम चर्चेचा विषय राहणार आहे. चौकशी कधी पूर्ण होणार? याच एका प्रश्नावर पुन्हा पुन्हा अडलेले दिसणार आहे. सेनगाव तालुक्यातही अशा प्रकरणात दोष स्पष्ट झाला, नावे निश्चित झाली. कारवाई झाली, वसुलीही झाली. मात्र, हिंगोली तालुक्याच्या प्रकरणात असे काहीच स्पष्टपणे समोर येत नसल्याने हा विषय मागील वर्षभरापासून चर्चेचा बनला आहे.