शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हिंगोलीत कयाधू नदीला पूर; आखाडा बाळापुर, कळमनुरी तालुक्यातील नदीकाठच्या १४ गावांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 13:59 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे. यामुळे नदी काठच्या १४ गावांना याचा मोठा फटका बसला आहे. 

आखाडा बाळापूर (हिंगोली) : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे. यामुळे नदी काठच्या १४ गावांना याचा मोठा फटका बसला आहे. 

दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे परिसरातील नदी, नाले , ओढे दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे कयाधू नदीला पूर आला आहे. पुराचा मोठा फटका नदीकाठच्या १४  गावांना बसला आहे. कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, सालेगाव, चाफनाथ, शेवाळा, डोंगरगाव पूल ,सापळी, कसबे धावंडा ,कोंढुर, डिग्रस, चिखली, कान्हेगाव, पिंपरी, येगाव या परिसरामध्ये पुराच्या पाण्याने प्रचंड हैदोस माजवला आहे. या परिसरातील ४० टक्के शेतीमध्ये पाणी घुसले असून यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

दरम्यान, आखाडा बाळापूर - हदगाव मार्गावरील शेवाळा नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. शेवाळा येथे पूरपरिस्थिती गंभीर आहे. येथे चौघेजण पुरात अडकले होते. त्यांची सुखरूप सुटका करून सर्वाना देवजना येथे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच बाळापुर ते बोल्डा रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यामुळे तोही मार्ग बंद पडला आहे. 

कवडी-येगाव रस्ता गेला वाहून कळमनुरी तालुक्यातील येगावं- कवडी या भागात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले झाले आहे. येगाव ते कवडी या दोन गावांना जोडणारा पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधलेला रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला. त्यामुळे दोन गावातील संपर्क तुटला आहे. तसेच दोन्ही गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून माती वाहून गेली आहे. 

तहसीलदारांची पाहणी

महसूल प्रशासन या घटनेवर बारीक लक्ष ठेवून असून ठीक ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी पाहणी केली असून नुकसानीचा अंदाज पूर ओसरल्यानंतर कळेल असेही त्यांनी सांगितले आहे