शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

हिंगोली जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया १६ जानेवारीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:30 IST

जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे परिपत्रक ग्रामविकास मंत्रालयाने ९ जानेवारी रोजी काढले आहे.

ठळक मुद्देग्रामविकास मंत्रालयाचा आदेश धडकला : सुधारित धोरणानुसार होणार कारवाई

कळमनुरी : जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे परिपत्रक ग्रामविकास मंत्रालयाने ९ जानेवारी रोजी काढले आहे.जिल्हा परिषद शिक्षकांचे जिल्हांतर्गत बदली २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. या सुधारीत धोरणानुसार संगणकीय पद्धतीने यावर्षीची बदली प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शिक्षकांचे शाळानिहाय मॅपिंग होणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. सर्व शाळा संचमान्यतेच्या कामामध्ये मग्न आहेत. शालेय क्रीडा व क्रीडा विभागाद्वारे सर्व शाळांना सरल प्रणालीद्वारे आॅनलाईन पद्धतीने संच मान्यता पूर्ण करण्यासाठी शाळेची व विद्यार्थ्यांची माहिती, शाळा व केंद्र प्रमुखांच्या लॉगीनवरून फॉरवर्ड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. १६ जानेवारीपासून लगेचच जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. ही कार्यवाही शाळा केंद्रप्रमुख स्तरावरून तातडीने व दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण केली जाणार आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शिक्षण विभागाच्या यंत्रणेला निर्देश देण्याची सूचना परिपत्रकात नमूद आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया विहित मुदतीत होणे गरजेचे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये हलगर्जी करणाºया कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोेजनाची प्रक्रिया १५ जानेवारीपूर्वी करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत ग्रामविकास व जलसंधारण विभागाने अवर सचिव प्रि.श. कांबळे यांनी ९ जानेवारी रोजी परिपत्रक काढले आहे. अवघड क्षेत्र व सोपे क्षेत्र यानुसार शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.अनेक दिवसांपासूनच्या चर्चेला विरामगेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांच्या बदल्यांवरून चर्चा होत होती. शिक्षक बदल्यांच्या धोरणाला शिक्षकांचा विरोध होता. त्याविरुद्ध अनेक संघटनांनी एकत्र येत मोर्चेही काढले होते. विशेष म्हणजे यात ज्येष्ठतेवर आधारित होणाºया बदलीमुळे सर्वच शिक्षक आॅक्सिजनवर राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच आपली बदली होणार असल्याचे दिसून येत आहे. तरीही शासनाला याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यास बराच काळ लागला होता. त्यामुळे उन्हाळ्यातच बदल्यांबाबत आदेश येतील, असे वाटत असताना मध्येच ते धडकल्याचे दिसून येत आहे.