शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया १६ जानेवारीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:30 IST

जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे परिपत्रक ग्रामविकास मंत्रालयाने ९ जानेवारी रोजी काढले आहे.

ठळक मुद्देग्रामविकास मंत्रालयाचा आदेश धडकला : सुधारित धोरणानुसार होणार कारवाई

कळमनुरी : जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे परिपत्रक ग्रामविकास मंत्रालयाने ९ जानेवारी रोजी काढले आहे.जिल्हा परिषद शिक्षकांचे जिल्हांतर्गत बदली २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. या सुधारीत धोरणानुसार संगणकीय पद्धतीने यावर्षीची बदली प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शिक्षकांचे शाळानिहाय मॅपिंग होणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. सर्व शाळा संचमान्यतेच्या कामामध्ये मग्न आहेत. शालेय क्रीडा व क्रीडा विभागाद्वारे सर्व शाळांना सरल प्रणालीद्वारे आॅनलाईन पद्धतीने संच मान्यता पूर्ण करण्यासाठी शाळेची व विद्यार्थ्यांची माहिती, शाळा व केंद्र प्रमुखांच्या लॉगीनवरून फॉरवर्ड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. १६ जानेवारीपासून लगेचच जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. ही कार्यवाही शाळा केंद्रप्रमुख स्तरावरून तातडीने व दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण केली जाणार आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शिक्षण विभागाच्या यंत्रणेला निर्देश देण्याची सूचना परिपत्रकात नमूद आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया विहित मुदतीत होणे गरजेचे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये हलगर्जी करणाºया कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोेजनाची प्रक्रिया १५ जानेवारीपूर्वी करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत ग्रामविकास व जलसंधारण विभागाने अवर सचिव प्रि.श. कांबळे यांनी ९ जानेवारी रोजी परिपत्रक काढले आहे. अवघड क्षेत्र व सोपे क्षेत्र यानुसार शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.अनेक दिवसांपासूनच्या चर्चेला विरामगेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांच्या बदल्यांवरून चर्चा होत होती. शिक्षक बदल्यांच्या धोरणाला शिक्षकांचा विरोध होता. त्याविरुद्ध अनेक संघटनांनी एकत्र येत मोर्चेही काढले होते. विशेष म्हणजे यात ज्येष्ठतेवर आधारित होणाºया बदलीमुळे सर्वच शिक्षक आॅक्सिजनवर राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच आपली बदली होणार असल्याचे दिसून येत आहे. तरीही शासनाला याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यास बराच काळ लागला होता. त्यामुळे उन्हाळ्यातच बदल्यांबाबत आदेश येतील, असे वाटत असताना मध्येच ते धडकल्याचे दिसून येत आहे.