शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हिंगोली जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीचे उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:10 IST

यावर्षी बोंडआळीने शेतक-यांना हैराण करुन सोडले असून, कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मात्र कपाशीला ४ हजार ७०० रुपयाचा भाव मिळाल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहेत.

ठळक मुद्देविक्रीस गर्दी : पांढ-या सोन्याला मिळताये ४ हजार ७०० रुपये भाव

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यावर्षी बोंडआळीने शेतक-यांना हैराण करुन सोडले असून, कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मात्र कपाशीला ४ हजार ७०० रुपयाचा भाव मिळाल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहेत.मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकºयांवर निसर्ग कोपल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालले आहेत. यंदाही निसर्गाने तर सोडलेच नाही त्यात भर म्हणून बोंड आळीने शेतकºयांच्या नाकीनऊ आणून सोडले आहेत. ज्या शेतीमध्ये क्विंटलाने होणारे कपाशीचे उत्पन्न झाले. ते आता किलोने मोजण्याची वेळ शेतकºयांवर येऊन ठेपली आहे. एकेकाळी शेतातून कापूस आणताना गाडीबैलांच्या दोन फेºया केल्या जात होत्या. आता मात्र कापूस डोक्यावर आणला जात आहे. मागील वर्षी तरी बºयापैकी उत्पन्न झाले होते. यंदा परिस्थिती फारच गंभीर असल्याचे शेतकºयांतून बोलल्या जात आहे. ४ हजार ३२० रुपये शासकीय भाव असून खाजगी बाजारात ४ हजार ७०० रुपये भाव मिळत असल्याने खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे शासकीय केंद्रावर कापसाची खरेदी केल्यानंतर पैशाची प्रतीक्षा करण्याचे टाळण्यासाठी खाजगी खरेदी केंद्रावर कापासाची शेतकरी विक्री करीत आहेत. एकट्या हिंगोली शहरात एकूण ६ खाजगी खरेदी केंद्र सुरु असून त्यापैकी एक बंद पडले आहे. फक्त ५ खरेदी केंद्रावर खरेदी सुरु आहे. तेथे रात्रीपासून वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.