शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

हिंगोलीत बोंडअळी सर्वेक्षण होतेय संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:52 IST

जिल्ह्यात कपासीचे अवघे ५४ हजार हेक्टर एवढेच क्षेत्र असतानाही बोंडअळीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकांतील कर्मचाºयांनी मात्र संथगतीने काम चालविले आहे. काहीजण तर या सर्वेचे कामच करीत नसल्याचे दिसून येत असून आता सलग तीन सुट्यांमुळे आणखी विलंबाची शक्यता आहे.

ठळक मुद्देआयुक्तांचेही पत्र : एकाही तालुक्याचा अहवाल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात कपासीचे अवघे ५४ हजार हेक्टर एवढेच क्षेत्र असतानाही बोंडअळीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकांतील कर्मचाºयांनी मात्र संथगतीने काम चालविले आहे. काहीजण तर या सर्वेचे कामच करीत नसल्याचे दिसून येत असून आता सलग तीन सुट्यांमुळे आणखी विलंबाची शक्यता आहे.जिल्ह्यात कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळी पडली आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. यावरून ओरड सुरू असतानाच शासनाने आधी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज करण्यास सांगितले होते. मात्र अनेक शेतकºयांकडे बियाणे खरेदीच्या पावत्या नव्हत्या. तर काहींना पेरापत्रक व इतर बाबींची स्वत: नोंद न केल्याने वेगळ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेकांना यापासून वंचितच राहावे लागले होते. त्यानंतर शासनानेच याची दखल घेत राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या धर्तीवर मदतीसाठी पंचनामे करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला दिला. जिल्हाधिकाºयांनीही संबंधित विभागाची बैठक घेवून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांमार्फत जिओ टॅगिंगद्वारे हे सर्वेक्षण करण्यास सांगितले होते. वसमत तालुक्यात सर्वाधिक २२ हजार हेक्टर क्षेत्र असल्याने हा तालुका वगळता इतरांचे सर्वेक्षण तरी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ते अजूनही सुरूच आहे. शिवाय विभागीय आयुक्तांनीही याबाबत मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.कळमनुरी : ग्रामसेवक निलंबनाचा प्रस्तावकळमनुरी: कापूस व धान्यपिकावर बोंडअळी व तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात कसूर केल्या प्रकरणी झुनझुनवाडीचे ग्रामसेवक दामोधर गंगाराम पोटे यांना निलंबित करण्याच्या कार्यवाहीची शिफारस जिल्हाधिकाºयांकडे २२ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केली. महाराष्टÑ नागरीसेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे विरूद्ध आहे. बेजबाबदारपणा व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे ग्रामसेवक पोटे यांना महाराष्टÑ नागरिसेवा (शिस्त अपील) नियम १९७९ चे नियम ४ (१) अन्वये निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.